Author: Team Avaantar

सुधीर करंदीकर उत्तम तब्येतीकरता भरपूर फिरा, असे सगळेच तज्ज्ञ सांगतात… आता घराच्या बाहेर पडलो की, छोटे – मोठे रस्ते क्रॉस करणे हे ओघाने आलेच. आपल्याकडे कुठलाही मोठा आणि खूप रहदारीचा रस्ता क्रॉस करायचा म्हणजे सगळ्यांच्याच अंगावर काटा उभा रहातो आणि याला कारण म्हणजे आपल्या इथली बेशिस्त (आपणच तयार केलेली) रहदारी! रस्ता क्रॉस करताना पण काही मज्जा येऊ शकते, यावर खरंतर कुणाचाच विश्वास बसणार नाही. पण अशक्य वाटणाऱ्या गोष्टी पण शक्य होऊ शकतात, हे सांगणारा माझा अनुभव आता सांगणार आहे. तो ऐकून आपल्याला पण असा अनुभव एकदातरी यावाच, असे सगळ्यांना नक्कीच वाटेल… नेहमीप्रमाणे आज सकाळी मुलीकडे बावधनला गेलो होतो. दुपारी ऋता…

Read More

माधवी जोशी माहुलकर “नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो, जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो…” सलील कुलकर्णींचे संगीत आणि संदीप खरेंचे शब्द. सगळंच अप्रतिम! ‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमाअंतर्गत त्यांनी जीवनातल्या छोट्या छोट्या अनुभवांवर, प्रसंगांवर प्रकाश टाकला आहे. ‘जरा चुकीचे अन् जरा बरोबर बोलू काही’ म्हणत सामान्य लोकांच्या भावभावनेला हात घातला आहे, त्यातीलच मला आवडलेली कविता, “नसतेस घरी तू जेव्हा…” ही कविता ऐकली की खरंच जीव कासावीस होतो. घरातील स्त्रीचे असणे किंवा नसणे दखलपात्र असतं, तिचे घरात असणंही तिच्या नसण्याइतकंच महत्त्वाचं असतं, जसा घरातील कर्तापुरुष हा त्या घराचा आधारवड असतो, तशी स्त्री ही त्या घराची आधारस्तंभ असते. प्रत्येक…

Read More

मेष या आठवड्यात तुमच्या जोडीदाराचा भाग्योदय होण्याची शक्यता आहे. नोकरदारांच्या नोकरीत बदल होऊ शकतो. नोकरीसंदर्भात आधी दिलेल्या मुलाखतीचे उत्तर येईल. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल. व्यावसायिक वर्गाची रखडलेली कामे मार्गी लागतील. कायदेशीर निर्णय तुमच्या बाजूने लागतील. वडिलोपार्जित संपत्तीविषयी महिलांचे वाद मिटतील. मेहनतीशिवाय पर्याय नाही, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. वृषभ या आठवड्यात सकारात्मकता अनुभवू शकाल. नोकरदारांना नवीन प्रोजेक्ट मिळतील. आधी केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळेल आणि कौतुक होईल. व्यावसायिक वर्गाकडून नवीन संकल्पना राबविल्या जातील आणि त्याद्वारे व्यवसायाला चांगला दर्जा मिळवून देतील. जुनी येणी वसूल होतील. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा फायदा मिळेल. महिलांनी विनयाने वागावे, घरात एखादे मंगलकार्य ठरेल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. मिथुन…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा अगा नांवें घेता वोखटीं । जे आघवेया अधमांचिये शेवटीं । तिये पापयोनीही किरीटी । जन्मले जे ॥443॥ ते पापयोनि मूढ । मूर्ख ऐसे जे दगड । परि माझां ठायीं दृढ । सर्वभावें ॥444॥ जयांचिये वाचे माझे आलाप । दृष्टि भोगी माझेंचि रूप । जयांचें मन संकल्प । माझाचि वाहे ॥445॥ माझिया कीर्तीविण । जयांचे रिते नाहीं श्रवण । जयां सर्वांगीं भूषण । माझी सेवा ॥446॥ जयांचें नाव विषो नेणे । जाणीव मजचि एकातें जाणे । जया ऐसें लाभे तरी जिणें । एऱ्हवीं मरण ॥447॥ ऐसा आघवाचि परी पांडवा । जिहीं आपुलिया सर्वभावा । जियावयालागीं वोलावा ।…

Read More

दर्शन कुलकर्णी रंगपंचमी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – सावध ऐका… नव्या ‘कल्चर’चा धोका! दिनविशेष प्रसिद्ध कवी, कथा-कादंबरीकार, नाटककार चिं. त्र्यं. खानोलकर टीम अवांतर प्रसिद्ध मराठी कथा-कादंबरीकार आणि नाटककार तसेच ‘आरती प्रभु’ या नावाने कवितालेखन करणारे चिं. त्र्यं. खानोलकर यांचा जन्म 8 मार्च 1930 रोजी बागलांची राई (ता. वेंगुर्ले, जि. रत्नागिरी) इथे झाला. ‘गुरूकुल’ (लोणावळा), आकाशवाणीचे मुंबई केंद्र आणि मुंबई विद्यापीठ या ठिकाणी 1959 ते 1965 या कालखंडात त्यांनी नोकऱ्या केल्या. त्यानंतर मात्र केवळ लेखनासच वाहून घेतले. जोगवा, दिवेलागण, नक्षत्रांचे देणे यासारखे कवितासंग्रह, रात्र काळी घागर काळी, अजगर, कोंडुरा, त्रिशंकू यासारख्या कादंबऱ्या, एक शून्य बाजीराव, सगेसोयरे, अवध्य, कालाय तस्मै नमः यासारखी नाटके तर सनई, गणुराया आणि चानी, राखी…

Read More

डॉ. श्रीकांत राजे होमिओपॅथी चिकित्सक वेळ सकाळी सातची. मी स्टेशनरी दुकानात गेलो होतो. त्यावेळी एक युनिफॉर्ममधला, नावाजलेल्या शाळेचा विद्यार्थी दुकानात आला. वडील गाडीत बसले होते. मुलगा दुकानदाराला म्हणाला, “काका थम्सअप आहे? हं, एक स्प्राइट द्या… आणि एक एनर्जी ड्रिंक द्या.” माझ्यासमोर त्याने आपल्या शाळेची वॉटर बॅग उघडली. फसफसणारे सॉफ्ट ड्रिंक त्याने एकत्र करून त्या वॉटर बॅगमध्ये भरले. रिकाम्या झालेल्या सॉफ्ट ड्रिंक्सच्या बाटल्या तशाच ठेवल्या. “काका, बाबा म्हणाले हे पैसे उद्या देतो…” असे म्हणून आपल्या गाडीत बसून निघून गेला. मोठ्या “हाय प्रोफाइल” शाळा आम्ही निवडल्या. तेथील ‘कल्चर’ कशा प्रकारच्या धोकादायक वळणावर आहे, त्याचा हा एक अनुभव. सकाळच्या शाळा… चांगल्या आहाराचा नावापुरताच…

Read More

रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही प्रकार ‘फूड कॉर्नर’मध्ये देत आहोत. बीटचा मठ्ठा, मेथीची कोफ्ताकरी, स्वादिष्ट पन्हे बनविण्याच्या या टिप्स वापरून पाहा. हेही वाचा – Kitchen Tips : कारल्याची भाजी, मसालेदार भाज्या, मिरचीचा ठेचा बनविताना… हेही वाचा – Kitchen Tips : मटार पुलाव, शाही पनीर, चाकवताची भाजी बनवताना वापरा या टिप्स तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील. (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

Read More

डॉ. विवेक वैद्य अप्पासाहेब इनामदार वारल्यानंतर बरोबर पंधराव्या दिवशी तात्या त्यांच्या बंगल्यावर गेले. अप्पासाहेबांच्या खुर्चीवर बसलेल्या त्यांच्या मुलाला, माधवला नमस्कार करत म्हणाले, “मी तात्या राहाणे. तुम्ही बंगला फर्निचरसकट विकायला काढला असे कळाले?” “हो. तुम्हाला इंटरेस्ट आहे?” त्यांच्या सामान्य व्यक्तिमत्वाकडे पाहून माधवने काहीसे आश्चर्याने विचारले. “नाही हो, एवढी माझी परिस्थिती नाही… पण एक विनंती करायला आलोय.” “काय?” राघवने संशयाने विचारले. गरीबीचे सोंग घेऊन पैसे मागणारे बरेच जण त्याला भेटले होते. “अप्पांना वाचनाची आवड होती. त्यांनी बरीच पुस्तके विकत घेतली होती… साहित्यापासून ते वैदकशास्त्र ज्योतिषशास्त्रापर्यंत. जर ती पुस्तके चांगल्या स्थितीत असली तर, ती मला हवी आहेत. मला म्हणजे आमच्या वाचनालयाला.” हेही वाचा…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा जैसा दीपें दीपु लाविजे । तेथ आदील कोण हें नोळखिजे । तैसा सर्वस्वें जो मज भजे । तो मी होऊनि ठाके ॥428॥ मग माझी नित्य शांती । तया दशा तेचि कांती । किंबहुना जिती । माझेनि जीवें ॥429॥ एथ पार्था पुढतपुढती । तेंचि तें सांगो किती । जरी मियां चाड तरी भक्ती । न विसंबिजे गा ॥430॥ अगा कुळाचिया चोखटपणा नलगा । अभिजात्य झणीं श्लाघा । व्युत्पत्तीचा वाउगा । सोसु कां वाहावा ॥431॥ कां रूपे वयसा माजा । आथिलेपणें कां गाजा । एक भाव नाहीं माझा । तरी पाल्हाळ तें ॥432॥ कणेंविण सोपटें । कणसें लागलीं…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष संगीतकार रवी टीम अवांतर हिंदी चित्रपट सृष्टीतील नावाजलेले संगीतकार रवी यांचा जन्म 3 मार्च 1926 रोजी दिल्ली येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव रविशंकर शर्मा. खरंतर त्यांना पार्श्वगायक व्हायचे होते. सुरुवातीला उदरनिर्वाहासाठी इलेक्ट्रिशियन म्हणून काम करीत असताना ते हार्मोनियम आणि गाणे शिकले. 1950 साली गायक होण्यासाठी ते मुंबईला आले. दोन वर्षे संघर्ष करत राहिले. 1952 मध्ये हेमंत कुमार यांनी त्यांना ‘आनंदमठ’ या चित्रपटात ‘वंदे मातरम’ गीतात कोरसमध्ये गाण्याची संधी दिली. त्यानंतर त्यांची योग्यता ओळखून हेमंत कुमार यांनी त्यांना सहाय्यक म्हणून आपल्याकडे ठेवून घेतले. दोन-तीन वर्षांनंतर हेमंत कुमार यांनी त्यांना स्वतंत्रपणे काम करण्याचा सल्ला दिला…

Read More