Author: Team Avaantar

प्रणाली मंगेश महाशब्दे आज बऱ्याच दिवसांनी घरात गडबड नव्हती. आम्ही दोघे आणि आता आमची दोन मुलं म्हणजे मुलगा आरोह आणि मुलगी स्वरा असे चौघेच घरी होतो. तसे तर, आम्हाला तीन मुलं. मोठी मुलगी राणी जिचे एक महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. तीन महिन्यांपूर्वी लग्न ठरले. लग्न लवकर करायचे असे ठरले होते, कारण मुलाला सुटी नव्हती. तो एक महिन्याची सुट्टी घेऊन येणार होता. लग्न झाल्यावर मुलगी दुसऱ्या घरी यापेक्षा ती दुसऱ्या देशात जाणार, याचे जास्त दु:ख वाटत होते. त्यामुळे खूपच तयारी करायची होती. व्हिसासाठी फिरणे, लग्नाच्या खरेदीसाठी फिरण्यापेक्षा महत्त्वाचे होते. असो, सगळी गडबड संपून आज बऱ्याच दिवसांनी मी निवांत बसले होते. तेवढ्यात…

Read More

माधवी जोशी माहुलकर गणपत वाणी बिडी पितानाचावायाचा नुसतीच काडी;म्हणायचा अन मनाशीच कीया जागेवर बांधिन माडी… बा. सी. मर्ढेकरांची ही अजरामर कविता आपल्याला खूप काही शिकवून जाते. इयत्ता सातवी, आठवीत असताना ही कविता अभ्यासाला होती, पण तेव्हा त्यातील मर्म समजण्याची आमची कुवत नव्हती; पण आता वयाच्या पन्नाशीत जीवनाचे विविध अनुभव घेतल्यानंतर खरा ‘गणपत वाणी’ समजायला लागला. मर्ढेकरांचा गणपत वाणी हा एक विशिष्ट व्यक्तीसमूहाचे प्रातिनिधिक स्वरूप आहे, जो एका विशेष चौकटीमधेच आपले जीवन जगत असतो आणि त्याबाहेर जाऊन फारसे कष्ट न करता सुखासीन आयुष्याचे स्वप्न उराशी बाळगून असतो. त्याचे संपूर्ण आयुष्य फक्त स्वप्नरंजन करण्यातच जातं. आजही असे अनेक ‘गणपत वाणी’ आपल्या अवतीभवती…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा जो बहुवें विषयविलासें गुंफें । तो म्हणती उवायें पडिला सापें । जो अभिलाषभारें दडपे । तयातें सज्ञान म्हणती ॥509॥ जयाचें आयुष्य धाकुटें होय । बळ प्रज्ञा जिरोनि जाय । तयाचे नमस्कारिती पाय । वडिल म्हणोनि ॥510॥ जंव जंव बाळ बळिया वाढे । तंव तंव भोजें नाचती कोडें । आयुष्य निमालें आंतुलियेकडे । ते ग्लानीचि नाहीं ॥511॥ जन्मलिया दिवसदिवसें । हों लागे काळाचियाचि ऐसें । कीं वाढती करिती उल्हासें । उभविती गुढिया ॥512॥ अगा मर हा बोलु न साहती । आणि मेलिया तरी रडती । परि असतें जात न गणिती । गहिंसपणें ॥513॥ दर्दुर सापें गिळिजतु आहे…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय प्राच्यविद्या संशोधक वा. वि. मिराशी टीम अवांतर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय प्राच्यविद्यासंशोधक आणि भारतविद्यातज्ज्ञ वासुदेव विष्णू मिराशी यांचा जन्म 13 मार्च 1893 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील कुवळे (सध्या जि. सिंधुदुर्ग) येथे झाला. त्यांनी मॅट्रिक, बी. ए. आणि एम. ए. या सगळ्या महत्त्वाच्या परीक्षांमध्ये प्रथमवर्ग पटकाविला. त्यांनी सुरुवातीस मुंबईतील शासकीय एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये संस्कृत विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केले. या काळात त्यांनी एलएल. बी. पदवी प्राप्त केली. पुढे ते नागपूरच्या महाविद्यालयात नोकरी करू लागले. नागपूरमधील ‘विदर्भ संशोधन मंडळʼ या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. या संस्थेचे ते कार्याध्यक्ष होते. या माध्यमातून त्यांनी इंग्रजीतील…

Read More

वैद्य विष्णू देविदास सावंत निसर्ग जेव्हा जुनी पाने गाळून नव्या पालवीने नटतो, आम्रवृक्ष जेव्हा मोहराने बहरतात आणि कोकिळेचा कुहू-कुहू स्वर कानी पडतो, तेव्हा समजावे की ‘ऋतूराज’ वसंताचे आगमन झाले आहे. वसंतोत्सव हा केवळ निसर्गाचा उत्सव नसून तो मनाला आणि शरीराला नवचैतन्य देणारा काळ आहे. आयुर्वेदानुसार, प्रत्येक ऋतू आपल्यासोबत शरीरात काही बदल घेऊन येतो. शिशिर ऋतूत (थंडीत) शरीरात साठलेला ‘कफ’ वसंतातील सूर्याच्या उष्णतेने वितळू लागतो. ज्याप्रमाणे हिमालयातील बर्फ वितळून नद्यांना पूर येतो, तसेच शरीरातील कफ वितळल्याने अग्निमांद्य, सर्दी, खोकला, आळस आणि पचनाचे विकार उद्भवू शकतात. आपल्या पूर्वजांनी ‘वसंतोत्सव’ केवळ आनंदासाठी नाही, तर आरोग्यासाठीही आखला आहे. होळीच्या धगीतून मिळणारी उष्णता असो किंवा…

Read More

प्रदीप केळुस्कर भाग – 2 रविवारी विलास येऊन बाबांना घेऊन जातोय.. असे अनंताने घरी सांगताच विभा आणि रत्ना गप्प झाल्या. दोघींना हुरहूर लागून राहिली. विभाच्या डोळ्यांतून पाणी पाझरू लागले. रविवार म्हणजे दोन दिवस राहिले, हे लक्षात येताच तिने बेसन लाडू करायला घेतले… चकल्या केल्या. त्याचे छोटे डबे भरून ठेवले. काल बोलता बोलता बाबांना शिंपल्या फार आवडतात, हे तिला कळले. ती मुद्दाम मासेबाजारात गेली आणि तिने ताज्या शिंपल्या आणल्या आणि मालवणी पद्धतीने शिंपल्या बनवल्या. शिवाय इतर मासे होतेच! रविवारी दोघी गप्प गप्प होत्या. रत्ना तर आजोबांच्या खोलीतच होती. दुपारनंतर विलास आणि सरोज आले. सरोज विभाला म्हणाली, “विभा, तुला त्रास दिला गं…”…

Read More

साहित्य हेही वाचा – Recipe : तंदुरी पनीर कबाब अन् कुरकुरीत भेंडी कृती हेही वाचा – Recipe : अशी वरी तांदळाची खिचडी करून पाहिली आहे का? टिप (‘रुचिरा’ पुस्तकातून साभार) तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.

Read More

स्नेहा सुतार भाग – 5 खरंतर, जोरात आपटल्यामुळे डोकं जाम दुखायला लागलेलं. टेंगुळ बिंगुळ नाही ना, तिने एकदा मोबाइलच्या कॅमेऱ्यात सेल्फी मोडवर बघून घेतलं. लालसर झालेलं दिसत होतं. गाडी मुळगावला पोहोचली, तेव्हा आता सगळं आवरून बसुया म्हणून तिने बॅगची चेन नीट बंद केली. इअरफोन काढून वरच्या कप्प्यात टाकले, त्याचीही चेन लावली. आता जरा ती सावरुन बसली. गार वारा चेहऱ्यावर येत होता. पाऊस पडून गेल्यामुळे सगळी झाडं निथळत थरथरत उभी होती. “सुशांत बार” कंडक्टर ओरडला. दोन माणसं पुढे सरसावली. त्यांचा स्टॉप आल्यामुळे गर्दी ढकलत, उकलत पुढे गेली आणि दाराकडल्या दांड्याला धरून उभी राहिली. “राव रे, सुशांत बार्र” पुढच्या माणसाने कंडक्टरला सांगितलं.…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा बाप दुःखाचें केणें सुटलें । जेथ मरणाचे भरे लोटले । तिये मृत्युलोकींचिये शेवटिले । येणें जाहालें हाटवेळे ॥496॥ आतां सुखेंसि जीविता । कैंचीं ग्राहिकी कीजेल पांडुसुता । काय राखोंडी फुंकितां । दीपु लागे ॥497॥ अगा विषाचे कांदे वाटुनी । जो रस घेइजे पिळुनी । तया नाम अमृत ठेउनी । जैसें अमर होणें ॥498॥ तेविं विषयांचें जें सुख । तें केवळ परम दुःख । परि काय कीजे मूर्ख । न सेवितां न सरे ॥499॥ कां शीस खांडुनि आपुलें । पायींचां खतीं बांधिलें । तैसें मृत्युलोकींचें भलें । आहे आघवें ॥500॥ म्हणोनि मृत्युलोकीं सुखाची कहाणी । ऐकिजेल कवणाचां…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण टीम अवांतर महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जन्म 12 मार्च 1914 रोजी देवराष्ट्रे (सातारा जिल्हा) येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. 1930 साली महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली, त्यात त्यांनी भाग घेतला होता. 1932 साली त्यांना पहिला तुरुंगवास घडला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात ते सामील झाले होते. सातारा जिल्ह्यातील भूमिगत चळवळीत त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. 1946 साली तेव्हाच्या मुंबई प्रांताच्या विधिमंडळाची निवडणूक होऊन यशवंतराव चव्हाण दक्षिण सातारा मतदार संघातून निवडले गेले आणि संसदीय चिटणीस झाले. 1948 साली त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या चिटणीसपदावर नियुक्ती झाली तर…

Read More