Author: Team Avaantar

डॉ. सारिका जोगळेकर होमिओपॅथिक तज्ज्ञ मानवी शरीरात घडणाऱ्या जैविक प्रक्रियांपैकी पचनक्रिया ही सर्वात सूक्ष्म, परंतु अत्यंत महत्त्वाची असते. आपण जे अन्न खातो त्यातून शरीराला ऊर्जा, पोषकद्रव्ये आणि वाढीसाठी आवश्यक घटक मिळवण्याचे काम ही प्रक्रिया अखंडपणे पार पाडते. खाण्यानंतर पचनाची प्रक्रिया आपल्या तोंडापासून सुरू होते. जेव्हा आपण अन्न खातो, तेव्हा आपल्या तोंडातील लाळ अन्नासोबत मिसळते. लाळेमध्ये काही एन्जाईम्स असतात जे अन्नातील कार्बोहायड्रेटचे विघटन सुरू करून पचनाची प्रक्रिया सुरू करतात. तोंडातील चवीची अनुभूती देखील पचनास मदत करते, कारण चव ओळखल्यानंतर शरीरात पचनासाठी आवश्यक रसायने तयार होतात. अन्न जितकं व्यवस्थित चावले जाते, तितकं पुढील अवयवांचा अन्न पचवण्याचा ताण कमी होतो आणि म्हणून जास्त…

Read More

स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये बटाटेवडे, सामोसे, उडीदवडे बनविण्याच्या टिप्स पाहूयात. हेही वाचा – Kitchen Tips : सुरळीच्या वड्या, खमंग कांदा भजी, स्वादिष्ट दहिवडे… हेही वाचा – Kitchen Tips : केळ्याचे वेफर्स, पपईची भजी, हरभऱ्याची तळलेली डाळ… (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

Read More

डॉ. विवेक वैद्य ऑफिसला निघालो होतो. गावाबाहेर असलेल्या महादेवाच्या मंदिरात गेलो होतो. सध्या आयुष्यात काहीच ठीक चालले नव्हते… अशावेळी बरोबर देवाची आठवण येते. दुसऱ्या रस्त्याने गावात आलो तर, रस्त्याच्या एका बाजूला बायकांची भली मोठी रांग. अगदी अर्धा किलोमीटर तरी असेल! प्रथम लक्षातच आले नाही, ही कसली रांग? मग समजले सरकारतर्फे गरीब कष्टकरी महिलांना मोफत भांडेवाटप होते, त्याची ती रांग होती. अचानक रांगेत एक ओळखीचा पंजाबी ड्रेस दिसला. पुन्हा वळून पाहिले पण एवढ्या गर्दीत काही दिसेना, मोटरसायकल वळवून पुन्हा 100-150 फूट मागे गेलो. पुन्हा तोच ड्रेस दिसला. ड्रेस घातलेली तरुणी माझ्यापासून चेहरा लपवत होती. मी मोटरसायकल रस्त्याच्या बाजूला लावली आणि शांतपणे…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा जाणिजे योगपीठीचा भैरवु । काय हा आरंभरंभेचा गौरवु । कीं वैराग्यसिद्धीचा अनुभवु । रूपा आला ॥462॥ हा संसार उमाणितें माप । कां अष्टांगसामग्रीचे दीप । जैसे परिमळेंचि धरिजे रूप । चंदनाचें ॥463॥ तैसा संतोषाचा काय घडिला । कीं सिद्धभांडारींहूनि काढिला । दिसे तेणें मानें रूढला । साधकदशे ॥464॥ प्रयत्नाद् यतमानस्तु योगी संशुद्धकिल्बिषः । अनेकजन्मसंसिद्धस्ततो याति परां गतिम् ॥45॥ जे वर्षशतांचिया कोडी । जन्मसहस्त्रांचिया आडी । लंघितां पातला थडी । आत्मसिद्धीची ॥465॥ म्हणोनि साधनजात आघवें ।…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असेल. कोणत्याही व्यक्ती, बँक किंवा संस्थेकडून कर्ज घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. जुन्या मित्रांचा पाठिंबा मिळेल. काही नवीन लोकांशी संपर्क होईल, ज्याचा भविष्यात फायदा होईल. जोडीदाराकडून समाधानकारक पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातील नफा पाहून तुम्हाला आनंद होईल. वृषभ – आजचा दिवस खूप धावपळीचा आणि दगदगीचा असेल. त्यामुळे जास्त काळजी घ्यावी लागेल. या काळात पायाला दुखापत होण्याची शक्यता आहे. दृढनिश्चयी स्वभाव आज फायदेशीर ठरेल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात. पैसे गुंतवायचे असतील तर ते काम आजच करा; भविष्यात चांगले फायदे मिळतील. मिथुन – आधीच आजाराने…

Read More

अजित गोगटे पुण्यातील एका इसमाने 27 वर्षांपूर्वी केलेल्या, परंतु कायद्याच्या दृष्टीने सिद्ध होऊ न शकलेल्या पहिल्या लग्नाचे गूढ कथानक आज मी सांगणार आहे. पहिल्या लग्नाची पत्नी हयात असूनही आणि तिला रीतसर घटस्फोट न देता आणखी एका स्त्रीशी फसवणुकीने विवाह करणे हे भारतीय दंड विधांनाच्या (Indian Penal Code) 494 आणि 495 या कलमान्वये गुन्हे आहेत. त्यासाठी अनुक्रमे सात आणि 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा आहे. या गुन्ह्यांसाठी या इसमाविरुद्ध दाखल खटल्याने या कथानकाची सुरुवात होते आणि अपिलात हायकोर्टाने त्याला निर्दोष सोडण्यात सांगता होते. या कथानकास गूढ म्हणण्याचे कारण असे की, त्यात दोन समांतर शक्यता तुल्यबळ संभाव्यतेने दिसतात. एक म्हणजे, दुसरे लग्न करण्याआधी…

Read More

सायली कान्हेरे थंडी पडायला सुरुवात झाली आहे. अशा वातावरणात गरमागरम सूप प्यायला खूप मजा येते. पण ही सूप्स करायला काहींना कठीण वाटतात. आज मी एका सोप्या सूपची रेसिपी सांगणार आहे. जी करायला सोपी आणि खूप टेस्टी आहे. तुम्हीही नक्की करून बघा. साहित्य पुरवठा संख्या : 2 व्यक्तींसाठी तयारीस लागणारा वेळ : लसूण सोलायला – 1 मिनिट शिजवण्याचा वेळ : 15 मिनिटे एकूण वेळ : 16 मिनिटे हेही वाचा – Recipe : स्वादिष्ट कोळाचे पोहे कृती हेही वाचा – Recipe : खमंग कोबी पोहे अन् पास्ता सलाड विशेष आहार माहिती : शाकाहारी, प्रोटिनयुक्त टिप्स तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर,…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा मोटकी देहाकृति उमटे । आणि निजज्ञानाची पाहांट फुटे । सूर्यापुढां प्रगटे । प्रकाशु जैसा ॥452॥ तैशी दशेची वाट न पाहातां । वयसेचिया गांवा न येतां । बाळपणींच सर्वज्ञता । वरी तयातें ॥453॥ तिये सिद्धप्रज्ञेचेनि लाभें । मनचि सारस्वतें दुभे । मग सकळ शास्त्रें स्वयंभें । निघती मुखें ॥454॥ ऐसें जें जन्म । जयालागीं देव सकाम । स्वर्गीं ठेले जप होम । करिती सदा ॥455॥ अमरीं भाट होईजे । मग मृत्युलोकातें वानिजे । ऐसें जन्म…

Read More

दर्शन कुलकर्णी अमावस्या वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – धोरणात्मक निर्णयांसाठी त्वरित हालचाल करणे आवश्यक आहे. आक्रमक पवित्र्यामुळे एखाद्यासोबतच्या भावनिक संबंधांना धक्का बसू शकतो, त्यामुळे शब्द जपून वापरा. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. प्रवास पुढे ढकलणे फायदेशीर ठरेल. वृषभ – कौटुंबिक जीवनात एखाद्या विशिष्ट मुद्द्यावर सगळ्यांसोबत झालेले एकमत परस्परांवरील विश्वास वाढवेल, जो भविष्यातील अनेक समस्या सोडवण्यास उपयुक्त ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाच्या पद्धतीचे कौतुक केले जाईल. मिथुन – विरोधक कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यावर हुशारीने उपाय शोधावे लागतील. एखाद्या विशिष्ट व्यक्तीसोबत भावनिक संबंध वाढतील. नवीन व्यवसाय सुरू होण्यास वेळ लागेल, त्यामुळे धीर धरा. कर्क – तुमच्या…

Read More

नितीन फलटणकर “आज या बाकड्यावर बसू आपण. तिकडे खूप डास चावतात… आणि इथला व्ह्यू पण किती छान आहे पाहा… अगं, ही तुझी बॅग आवर. कशाला आणलीस काय माहिती! हल्ली तुझंही असं वागणं वाढलंय…” दिनकरराव आणि मंदाताई सायंकाळी फिरायला आले होते. रोजचा शिरस्ताच होता त्यांचा. रिटायर झाल्यानंतर दिनकरराव आपल्या मुलाकडे राहायला आलेले, पुण्यात… कोथरूडला. त्यांच्या सोसायटीमध्येच एक बाग होती. तिथं दोघे रोज येत. विकास (दिनकररावांचा मुलगा) आणि सून अनुश्री यांच्याशी काही खटकलं तर, ते हमखास येत बागेत. खूपवेळ बागेत बसायचं आणि नंतर रात्री जेवणासाठी म्हणून घरी परतायचं… असंच काहीसं नियोजन रोज त्यांचं ठरलेलं. मुळात दिनकरराव लष्करातून निवृत्त झालेले. त्यांना बेशिस्तपणा जमत…

Read More