Author: Team Avaantar

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली अध्याय दुसरा देवा समुद्र गंभीर आइकिजे । वर तोहि आहाच देखिजे । परी क्षोभु मनीं नेणिजे । द्रोणाचिये ॥39॥ हें अपार जें गगन । वर तयाही होईल मान । परि अगाध भलें गहन । हृदय यांचे ॥40॥ वरी अमृतही विटे । कीं काळवशें वज्र फुटे । परि मनोधर्मु न लोटे । विकरविला हा ॥41॥ स्नेहालागीं माये । म्हणिपे तें कीरु होये । परि कृपा ते मूर्त आहे । द्रोणीं इये ॥42॥ हा कारुण्याची…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 20 ऑगस्ट 2025; वार : बुधवार भारतीय सौर : 29 श्रावण शके 1947; तिथि : द्वादशी 13:58; नक्षत्र : पुनर्वसू 24:26 योग : सिद्धी 18:13; करण : गरज 25:18 सूर्य : सिंह; चंद्र : मिथुन 18:35; सूर्योदय : 06:20; सूर्यास्त : 19:03 पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 प्रदोष वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – दिवस संमिश्र असेल. व्यवसायासंदर्भात प्रवास करावा लागेल, त्यातून काही किरकोळ लाभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्य असल्यास प्रवासाचा बेत सध्यासाठी पुढे…

Read More

अस्मिता हवालदार अनेकांनी या कादंबरीवर लिहिले आहे. मीही एकटेपणाबद्दल लिहिताना याच कादंबरीचा उल्लेख करते. गोनीदा म्हणजेच गो. नी. दांडेकर यांच्या ‘मृण्मयी’, ‘शितू’, ‘पडघवली’, ‘दास डोंगरी राहतो’ यासारख्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत, पण ‘माचीवरला बुधाची’ बात ही कुछ और है! कड्यावर काटकुळा मुंडासे बांधलेला बुधा उभा असल्याचे चित्र मुखपृष्ठावर आहे. कड्याच्या टोकापर्यंत आला आहे… समोर सरळसोट दरी आहे… बरोबर कुत्रा आहे… त्याने एक पाऊल पुढे टाकले की स्वर्गप्राप्तीच होणार आहे! पण त्याला फिकीर नाही. लढवय्याच्या आवेशात तो उभा आहे. समोर धबधबा कोसळतोय… पाऊस पडतोय… वीज लखाखते… जणू कादंबरीचं सार या चित्रात आहे. निसर्गाशी मैत्री, निसर्गातल्या आव्हानांचा निडर होऊन सामना करणे, त्यांच्यावर सुद्धा…

Read More

सतीश बर्वे भाग – 2 दोन्ही देवळांत छानपैकी दर्शन झालं. मन प्रसन्न झालं. अजून थोडावेळ मंदिराच्या परिसरात बसायचं होतं मला खरं. मी सौरभला तसं बोलणार इतक्यात सौरभला अचानक फोन आला. तो मला हातानेच थांब म्हणाला. पण पुढे पाच-दहा-पंधरा मिनिटं झाली तरी फोनवरचं बोलणं सुरूच होते. माझी चुळबुळ तिथल्या एका फुलांच्या स्टॉलवाल्याच्या लक्षात आली. त्याने मला खुणेनेच बोलवून तिथल्या एका खुर्चीवर बसायला सांगितले. अगदी देवासारखा धावून आला होता तो. मी त्या सुगंधी जागेजवळ जाऊन बसले ते बरंच झालं, कारण सौरभचा फोन बंद होण्याची चिन्हं दिसत नव्हती. फुलवाल्याशी गप्पा मारत असताना अचानक सावंतवाडीचा विषय निघाला आणि माझं मन बालपणात जाऊन बसले. “अरे,…

Read More

आराधना जोशी साहित्य पिवळी मूगडाळ – 1 वाटी उडदाची डाळ – 2 टेबलस्पून मीठ – चवीनुसार हिंग पावडर – पाव छोटा चमचा बारीक चिरलेला कांदा – अर्धी वाटी हिरवी मिरची – 2 नग उकडून घेतलेले स्वीट कॉर्न – अर्धी वाटी बारीक चिरलेली हिरवी सिमला मिरची – अर्धी वाटी किसलेले गाजर – अर्धी वाटी बारीक चिरलेला टोमॅटो – पाऊण वाटी जिरं – 1 लहान चमचा हळद – अर्धा लहान चमचा बेकिंग सोडा किंवा इनो – 1 टी-स्पून आलं – 1 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर – पाव वाटी बटर किंवा तेल – आवश्यकतेनुसार पुरवठा संख्या (Servings) : मध्यम आकाराचे 5 मूंगलेट तयारीस…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली अध्याय दुसरा अर्जुन उवाच – कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन । इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन ॥4॥ देवा हें येतुलेवरी । बोलावें नलगे अवधारीं । आधीं तूंचि चित्तीं विचारीं । संग्रामु हा ॥30॥ हें झुंज नव्हे प्रमादु । एथ प्रवर्तलिया दिसतसे बाधु । हा उघडा लिंगभेदु । वोढवला आम्हा ॥31॥ देखें मातापितरें अर्चिजती । सर्वस्वें तोष पावविजती । तियें पाठीं केवीं वधिजती । आपुलां हातीं ॥32॥ देवा संतवृंदु नमस्कारिजे । कां घडे तरी पूजिजे…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 19 ऑगस्ट 2025; वार : मंगळवार भारतीय सौर : 28 श्रावण शके 1947; तिथि : एकादशी 15:32; नक्षत्र : आर्द्रा 25:07 योग : वज्र 20:29; करण : कौलव 26:43 सूर्य : सिंह; चंद्र : मिथुन; सूर्योदय : 06:20; सूर्यास्त : 19:03 पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 मंगळागौरी पूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – दिवस अतिशय उत्तम आणि समाधानकारक जाईल. उत्पन्नात वाढ होईल. कामाच्या ठिकाणीही पगारवाढ होण्याचे शुभ संकेत आहेत. नोकरदारांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे.…

Read More

प्रदीप केळुसकर गणपती जवळ आले होते. मुंबईत त्याची तयारी सुरू झाली होती. जयवंतरावांचा गणपती कोकणात. त्यामुळे त्यांना गावी जायची इच्छा होती. कालच त्यांनी सावंतवाडी ट्रेनची दोन तिकिटे मिळविली होती. उषाताई आठवून आठवून गावी न्यायच्या वस्तूंची यादी करत होत्या. त्यांनी गावच्या जावेसाठी साडी, पुतणीसाठी ड्रेस मटेरिअल, दीरासाठी लेंगे… शिवाय मिठाई, अगरबत्ती, कापूर, लवंगा, मिरी, दालचिनी… खरेदी करून ठेवले होते. परवा पहाटे दादर स्टेशनवर पोहोचायचं होत. जयवंतराव सात वर्षांपूर्वी मिलमधून निवृत्त झाले. त्यामुळे रोज सकाळी बस पकडून लालबागला जाणे थांबले. मिळालेले पैसे व्यवस्थित गुंतवून त्याच्या व्याजातून दोघांचा उदरनिर्वाह सुरु होता. ते सकाळी पार्कमध्ये फिरायला जात. मग घरी येऊन नाश्ता करून बाजारात भाजी,…

Read More

रश्मी परांजपे भाग – 2 मागील लेखात आपण शाळा प्रवेशानंतरची पालकांची जबाबदारी काय असते, याविषयी काही निवडक मुद्दे अभ्यासले. या लेखात आपण सदर विषयावरील आणखीन काही मुद्द्यांवर ऊहापोह करणार आहोत. मुलाची शाळेतील उपस्थिती शाळा सुरू झाल्यानंतर सबळ कारण असल्याशिवाय मुलाला गैरहजर ठेऊ नये. तथापि, मुलाला गैरहजर ठेवण्याची गरज वाटल्यास शिक्षिकेला पूर्व-कल्पना द्यावी. मुलाच्या आजारपणात साहजिकच शाळेत जायला जमणार नाही. अशा परिस्थितीत मुलाला औषधोपचार तसेच विश्रांतीची गरज असते. महत्त्वाची बाब म्हणजे, मुलाला पूर्ण बरे वाटल्याशिवाय शाळेत पाठवू नये. तसेच ठोस कारण असल्याशिवाय मुलाला शाळा सुटण्यापूर्वी शाळेतून घरी नेऊ नये. मुलाला स्वच्छतेची सवय आपल्या मुलाला शाळेत शी-शू लागल्यावर सांगण्याची सवय लावावी. तसेच,…

Read More

पराग गोडबोले काल बऱ्याच दिवसांनी भोजनाला कळणाच्या भाकरीचा बेत होता. घरी ही भाकरी झाली की, मी आणि बायको हसतो खळखळून, जुन्या आठवणी आणि आमच्या घोर अज्ञानाची आठवण काढून! साधारण 1996-97चा काळ असावा, आम्ही नुकतेच डोंबिवलीला राहायला आलो होतो. आम्ही म्हणजे, मी, सौ आणि चार वर्षांचा लेक. स्वतःच्या वेगळ्या संसाराची नव्याची नवलाई आणि तारुण्याचा जोश सोबतीला होताच. हळूहळू स्थिरावत होतो नव्या ठिकाणी, नव्या शहरात आणि नव्या संसारात… आईवडिलांच्या सुरक्षित छत्राखालून बाहेर पडून, नव्या जबाबदारीला खांद्यावर घेऊन. स्वयंपाकघरात पण नवेनवे प्रयोग होत होते. सौ तशी जात्याच सुगरण त्यामुळे जिभेचे चोचले पुरवले जातच होते निरंतर. व्होल्टासमध्ये नोकरीला होतो. कंपनीत छान जेवण असायचं, त्यामुळे…

Read More