Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
सतीश बर्वे माझे ऑपरेशन एकदाचे व्यवस्थित पार पडले अन् माझ्यासकट राहुल, अभिषेक, सुमेध आणि ऋषिकेश सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला. गेले कित्येक दिवस सगळेजण माझ्यासाठी खूप धावपळ करत होते, कारण माझे घरचे असे कोणीच नव्हते इथे येण्यासारखे. ऑपेरेशनच्या आदल्या दिवशी मात्र सगळेच मनातून घाबरलेले होते. माझ्या खोलीतील वातावरण भावूक झाले होते. प्रत्येकाची समजूत काढणे मला खरोखरच कठीण गेले होते… पण माझा देवावर, डॉक्टरांवर आणि स्वतःवर विश्वास होता. मला खात्री होती यातून मी सहलीसलामत बाहेर येईन! कारण माझी इच्छाशक्ती जबरदस्त होती. माझ्यात सुधारणा झपाट्याने होत होती आणि कदाचित आठवड्यानंतर मला घरी जायची परवानगी मिळणार होती. आधी आम्ही ठरल्याप्रमाणे ऑपरेशननंतर अभिषेकने चैतन्यला अमेरिकेत…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय चौथा जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः । त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन ॥9॥ माझे अजत्वें जन्मणें । अक्रियताचि कर्म करणें । हें अविकार जो जाणे । तो परममुक्त ॥58॥ तो चालिला संगे न चळे । देहींचा देहा नाकळे । मग पंचत्वीं तंव मिळे । माझांचि रूपीं ॥ 59॥ वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः । बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः ॥10॥ एर्हवीं परापर न शोचिती । जे कामनाशून्य होती । वाटा केवेळीं…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 09 ऑक्टोबर 2025; वार : गुरुवार भारतीय सौर : 17 आश्विन शके 1947; तिथि : तृतीया 22:54; नक्षत्र : भरणी 20:02 योग : वज्र 21:32; करण : वणिज 12:37 सूर्य : कन्या; चंद्र : मेष 25:23; सूर्योदय : 06:30; सूर्यास्त : 18:22 पक्ष : कृष्ण; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस शुभ आणि फलदायी असेल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील, ज्यामुळे आनंद मिळेल. व्यावसायिकांना लहान प्रवासाचा फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांना…
प्रदीप केळुस्कर भाग – 1 मी माझ्या केबिनमध्ये बसून उद्याचा अग्रलेख लिहित होतो, यावेळी मी कुणाचाही फोन घेत नाही, पण माझ्या असिस्टंटने मला कळवले, फक्त संपादकासाठी म्हणून परदेशातून एक फोन आला आहे… मी चडफडत फोन उचलला. पलीकडून एका स्त्रीचा आवाज होता… “नमस्ते, प्रवीण बाबू बात कर रहे हैं क्या?” “हां, आप कौन और किधर से बात कर रही हैं?” “प्रवीण बाबू, मैं अमला शेख, दुबई से बात कर रही हूं…” “अच्छा, लेकिन मेरे पास आप का क्या काम है?” “प्रवीण बाबू, मैंने पता किया हैं, कि आप कोल्हापूर के सबसे मशहूर अखबार वाले हैं, मैं आप की बहन जैसी हूं…”…
माधवी जोशी माहुलकर भाग – 1 खरंतर, जीवन आणि मृत्यू या दोन घटनांवरच मनुष्य आपल्या आयुष्यातील आराखडे तयार करतो. भूतकाळ आणि भविष्यकाळाचा विचार करून वर्तमानातील सुखाचा विचार कधीच करत नाही, त्यामुळेच भौतिक गोष्टींच्या मागे लागून आपण जगण्यातला आनंद गमावतो. एखाद्याचे जगणे लक्षात राहते नाहीतर, मरणे लक्षात राहते! परंतु यामध्ये एखादी घटना जर अचंबित करणारी असेल तर, ती मात्र कायमची लक्षात राहते. त्यावरच आधारीत ही गोष्ट आहे. एक गाव होते. त्या गावातील चार-पाच सधन घर सोडली तर, इतर लोक साधारण परिस्थितीतील किंवा शेतकरी कुटुंबातील होते. त्या गावामध्ये अठरापगड जातीची लोक राहात होती. त्यामुळे गावाचा भांडणतंट्याचा निवाडा तिथल्या पंचायतीच्या सहाय्याने होत असे.…
मनीषा गोगटे दसरा झाल्यावर वेध लागतात ते, दिवाळीचे. हळूहळू घराघरातून फराळाचा घमघमाट यायला सुरुवात होते. या दिवाळी फराळ तयारीतील पहिला पदार्थ म्हणजे अनारसा! कारण त्याला करण्यास जास्त दिवस लागतात. साहित्य जाडे तांदूळ – अर्धा किलो (ज्याचा भात मोकळा होतो, असा कोणताही जुना तांदूळ) गूळ – तांदूळ पिठीच्या निम्म्या प्रमाणात पातळ साजूक तूप – साधारणपणे दीड टेबलस्पून खसखस – साधारणपणे दीड टेबलस्पून केळे किंवा दूध – अगदी किंचित तेल – अनारसा तळण्यासाठी हेही वाचा – Recipe : सात्विक पंचामृत केक कृती तांदूळ स्वच्छ धुवून तीन दिवसांसाठी भरपूर पाण्यात भिजवून ठेवायचा. पाणी रोज बदलून नवीन पाण्यात तांदूळ भिजवावेत. यामुळे तांदळाला आंबूस वास येत…
हिमाली मुदखेडकर नणंदेच्या मुलाचे लग्न ठरले आणि अनेक वर्षांनी पुन्हा एकदा जालन्याला जाण्याचा योग आला. लग्न तर एन्जॉय करायचेच आणि आरामही! असा सुटसुटीत कार्यक्रम ठरवून जालन्यात पाऊल ठेवले. नणंदेकडे पाहुण्यांचे उधाण आले होते… अगदी उत्सवाचे वातावरण… सनई चौघडे… सगळेच अगदी साग्रसंगीत! या सगळ्यात हिची मधे मधे लुडबुड सुरू होतीच… पण तिला कुणी फारसे महत्त्व देत नव्हते, उलट हाडतुडच येत होती बिचारीच्या वाट्याला… “सुले… काय तुझं इथे? हो बाजूला…” कुणीतरी वसकन ओरडले तिच्यावर… तशी ती तणतणत बाजूला झाली आणि रागात निघून गेली. ‘सुलू…’ हिला मी विसरलेच होते. तसं तिला लक्षात ठेवावं, असा तिचा माझा फारसा सहवासही नव्हताच. तिची माझी पहिली भेट…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय चौथा श्री भगवानुवाच : बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन । तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप ॥5॥ तंव कृष्ण म्हणे पंडुसुता । तो विवस्वतु जैं होता । तैं आम्ही नसों ऐसी चित्ता । भ्रांति जरी तुज ॥41॥ तरी तूं गा हें नेणसी । पैं जन्में आम्हां तुम्हांसी । बहुतें गेलीं परी तियें न स्मरसी । आपली तूं ॥42॥ मी जेणें जेणें अवसरें । जें जें होऊनि अवतरें । ते समस्तही…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 08 ऑक्टोबर 2025; वार : बुधवार भारतीय सौर : 16 आश्विन शके 1947; तिथि : द्वितीया 26:22; नक्षत्र : अश्विनी 22:45 योग : हर्षण 25:32; करण : तैतिल 16:08 सूर्य : कन्या; चंद्र : मेष; सूर्योदय : 06:30; सूर्यास्त : 18:23 पक्ष : कृष्ण; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – इच्छा प्रत्यक्षात येण्यासाठी विचार आणि ऊर्जा यांचा योग्य वापर करा. विचार न करता खर्च करणे किती नुकसान करणारे असते याचा प्रत्यय येईल. व्यावसायिकांना…
डॉ. अस्मिता हवालदार रणांगण वाचायला घेतली तेव्हा प्रथम अर्पण पत्रिका पाहिली ‘_ मादमायसेल रोला यांस.’ ही कोण? प्रश्नच पडला. मी जेव्हा ही कादंबरी वाचली त्यावेळी गुगलून उकल करण्याची सोय नव्हती. विश्राम बेडकर यांची ‘रणांगण’ कादंबरी मराठी साहित्यात मैलाचा दगड समजली जाते. यावर इतक्या समीक्षा आहेत की, समीक्षांचे संकलन पुस्तक रूपाने होऊ शकेल. प्रतिक्रिया सर्व प्रकारच्या आहेत… ॲसिडिक न्यूट्रल अल्कलाइन! अत्यंत टुकार ते मराठीत यानंतर असे कादंबरी लेखन झालेच नाही इथपर्यंत… मी दोन्ही मतांशी सहमत नाही! पहिले महायुद्ध संपलेले असते आणि दुसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर जग उभे असते, तेव्हा हे कथानक घडते. त्यावेळी विमान प्रवास फारसा नसल्याने बोटीनेच प्रवास केला जात असे.…
