Author: Team Avaantar

माधवी जोशी माहुलकर अंबाडीची भाजी ही लोहयुक्त आहे, अंबाडीमुळे हिमोग्लोबिनचे प्रमाणात वाढ होते. दृष्टीक्षमता वाढते. शिवाय, त्वचेवरील रोगांचे संक्रमण कमी होतात, रोगप्रतिकार शक्ती वाढवते. एवढेच नव्हे तर, अंबाडीच्या सेवनाने पचन सुधारते, भूक वाढते. हाडे मजबूत होण्यास मदत होते. अंबाडीचा रसाचे सेवन मधुमेहीसाठी योग्य असल्याचे मानले जाते. अंबाडीचा सेवनाने रक्‍तवाहिन्यांचे कार्य व्यवस्थित होते. परिणामी हृदयरोग, उच्च रक्‍तदाब नियंत्रणास मदत होते. अंबाडीच्या फुलांपासून जॅम, चहा, सरबत, चटणी आणि जेली, पानांपासून सूप, लोणचे, बियांपासून बेसन आदी नावीन्यपूर्ण प्रक्रिया पदार्थ तयार करणे शक्य आहे. अंबाडीच्या पानांची आंबटगोड भाजी ज्वारीच्या किंवा तांदळाच्या कण्या घालून खूप छान होते आणि यासोबत भाकरी म्हणजे काय सुख असतं, हे खाणाऱ्यालाच…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः । यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते ॥22॥ मग मेरुपासूनि थोरें । देह दुःखाचेनि डोंगरे । दाटिजो पां परि भारें । चित्त न दटे ॥369॥ कां शस्त्रेंवरी तोडिलिया । देह आगीमाजीं पडलिया । चित्त महासुखीं पहुडलिया । चेवोचि नये ॥370॥ ऐसें आपणपां रिगोनि ठाये । मग देहाची वास न पाहे । आणिकचि सुख होऊनि जाये । म्हणूनि विसरे ॥371॥ तं विद्यात् दुःखसंयोगवियोगं योगसंज्ञितम् । स् निश्चयेन योक्तव्यो…

Read More

दर्शन कुलकर्णी संकष्ट चतुर्थी (चंद्रोदय 08:34) वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – निरामय मानसिक आरोग्य दिनविशेष अभिनेता, दिग्दर्शक विनय आपटे टीम अवांतर मुंबई दूरदर्शनच्या छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरची सुरुवात करणारे ‘आपटे स्कूल’चे प्रणेते, अभिनेता, दिग्दर्शक विनय आपटे यांचा जन्म 17 जून 1951 या दिवशी मुंबईत झाला. राज्य नाट्य स्पर्धेच्या ‘मॅन विदाऊट शॅडो’ या नाटकातून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं. एकांकिकांपासूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात झाली. राज्य नाट्य स्पर्धेत सलग तीन वर्षं सर्वात्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळवण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. 1972 ला मुंबईत दूरदर्शनमध्ये निर्माता म्हणून त्यांनी पाऊल ठेवलं. यानंतर त्यांनी अनेक दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती केली. ‘नाटक’, ‘गजरा’,…

Read More

स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये केळ्याचे पिवळे वेफर्स, पपईची भजी, हरभऱ्याची तळलेली डाळ बनविण्याच्या टिप्स पाहुयात. हेही वाचा – Kitchen Tips : घोसाळ्याचे पोहे, शिळ्या पोळ्यांची शेव अन् खरवसाचा केक… हेही वाचा – Kitchen Tips : स्वादिष्ट दहीवडे, हलका ढोकळा, कुरकुरीत कचोरी… (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

Read More

डॉ. विवेक वैद्य सकाळी आवरून दवाखान्यात जायला निघालो तर, माझा जवळचा मित्र अजितचा फोन… “वैद्य… जरा ताबडतोब घरी ये. अमितला बरं नाही.” त्याचा आवाज घाबरलेला… काय झाले असावे? कालपर्यंत तर ठीक होता अमित. पण वेळ काही विचारण्याची नव्हती, मी म्हणालो “लगेच येतो.” घरी पोहाचलो तर, वहिनी अमितला धरून बसलेल्या. अमितच्या मनगटाला रक्ताळलेला रुमाल बांधलेला. काय झालं असावं, याचा मला अंदाज आला. मी भराभर रूमाल सोडला. सुदैवाने, जखम खोल नव्हती. मी जखम साफ करून पट्टी बांधली. धनुर्वाताचे इंजेक्शन दिले. या सर्व उपचारादरम्यान अमित काहीसा बधीर वाटला. वहिनी मात्र त्याला एखाद्या लहान मुलासारखे धरून अधूनमधून डोळ्याचे पाणी पुसत होत्या. अशाप्रसंगी काही बोलायचे…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा आतां तुझें मनोगत जाणोनि । कांहीं एक आम्ही म्हणोनि । तें निकें चित्त देऊनि । परिसावें गा ॥359॥ तूं प्राप्तीची चाड वाहसी । परि अभ्यासीं दक्षु नव्हसी । तें सांग पां काय बिहसी । दुवाडपणा ॥360॥ तरी पार्था हें झणें । सायास घेशी हो मनें । वायां बागुल इयें दुर्जनें । इंद्रिये करिती ॥361॥ पाहें पां आयुष्याचा अढळ करी । जें सरतें जीवित वारी । तया औषधातें वैरी । काय जिव्हा न म्हणे ॥362॥…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – कोणाशीही वाद होणार नाही, याची काळजी घ्या. एखाद्या फायदेशीर कामात सक्रिय असाल. आज काही प्रमाणात एकाग्रता निर्माण होईल. कामाच्या व्यग्र वेळापत्रकामुळे आराम आणि विश्रांतीवर परिणाम होईल. धार्मिक कार्यात रस निर्माण होईल. आज समाजातील काही प्रतिष्ठित लोकांकडून पाठिंबा मिळेल. भावा-बहिणींमधील प्रेम वाढेल. वृषभ – कामे सुरळीतपणे होतील, पण आजचा दिवस नकारात्मक परिणामांचा असेल, हे लक्षात ठेवा. ज्यांना हितचिंतक समजता तेच तुमच्या नकळत नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. सध्या व्यवसायाशी संबंधित प्रवास पुढे ढकला. कुटुंबातील सदस्यांच्या पाठिंब्याने आणि समन्वयाने काही बाबतीत तुमचे काम सोपे होईल. मिथुन – कठोर परिश्रमाने ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न…

Read More

भाग – 3 ती व्यक्ती आता अनोळखी राहिली नव्हती. त्या माणसाकडून कोणताही धोका नाही, याची त्या शीख युवकाला ठाम खात्री पटली होती. जंगलातला एकांत, त्या दिवसाचा थकवा आणि पोटातलं समाधान… या सगळ्यांनी मिळून त्याच्या मनातल्या वादळांना थांबवलं होतं. तो मोकळा श्वास घेत शांत बसला आणि पहिल्यांदाच, त्या अज्ञात व्यक्तीकडे पाहून त्याला वाटलं, “मी इथे काही काळ सुरक्षित आहे!” त्या अन्नाने शरीरात ऊर्जा परत आली होती. आता मन थोडं स्थिर झालं होतं. आजूबाजूचं जंगल, त्या गुहेचा अंधुकसा आडोसा आणि समोर बसलेली ती शांत पण गूढ व्यक्ती… या सगळ्याकडे पाहात तो युवक थोडा वेळ गप्प बसला. थोड्या वेळाने त्याने आजूबाजूचा कानोसा घेतला…

Read More

संगीता भिडे (कमल महाबळ) पुतळे असावेत की नसावेत, यावर विचार मांडण्यापूर्वी ‘पुतळा’ ही संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे, असं मला वाटतं. कोणता ना कोणता आदर्श समोर ठेवून प्रत्येक व्यक्ती आपलं जीवन जगत असते. मगे तो आदर्श कौटुंबिक, सामाजिक, राजकीय शैक्षणिक, अध्यात्मिक वा अन्य कोणत्याही क्षेत्रातील असू शकतो. यात काही भाग अनुकरणाचाही असतो. अगदी लहान मूलसुद्धा याला अपवाद ठरत नाही. म्हणूनच, एखादा चिमुरडा सहजपणे सांगतो, ‘मी मोठ्ठा झाल्यावर बाबांसारखा प्राध्यापक, डॉक्टर होणार आहे…’ तर एखादा सांगतो, ‘मला जयंत नारळीकर, सचिन तेंडुलकर व्हायचं आहे…’ एखादी मुलगी मोठ्या ऐटीत सांगते, ‘मी किरण बेदी होणार! लता मंगेशकर होणार!’ थोडक्यात, आमचे हे आदर्श आम्हाला आमच्यासमोर…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा मग म्हणे गा पार्था । ते हे ऐसी व्यवस्था । अनियतासि सर्वथा । योग्यता नाहीं ॥344॥ नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः ।  न चातिस्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन ॥16॥ जो रसनेंद्रियाचा अंकिला । कां निद्रेसी जीवें विकला । तो नाहीं एथ म्हणितला । अधिकारिया ॥345॥ अथवा आग्रहाचिये बांदोडी । क्षुधा तृषा कोंडी । आहारातें तोडी । मारुनियां ॥346॥ निद्रेचिया वाटा नवचे । ऐसा दृढिवेचेनि अवतरणें नाचे । तें शरीरचि नव्हे तयाचें । मा योगु कवणाचा ॥347॥ म्हणोनि…

Read More