Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
मंदार अनंत पाटील एकेदिवशी रात्री बाबांनी कामावरून येताना अचानक माझ्याकरिता एक पांढरे आणि तपकिरी ठीपके असलेले अतिशय सुंदर आणि गुटगुटीत गावठी पिल्लू आणले. माझा आनंद गगनात मावेना… माझ्यासाठी फार अनपेक्षितच होते. एक-दोन महिन्यांचे गोंडस असे ते पिल्लू होते. मी लगेचच माझ्याकडे जमविलेले सामान वापरून त्या पिल्लाकरिता गादी आणि इतर गोष्टी नीट मांडून ठेवल्या. ते पिल्लू आई आणि भावंडापासून वेगळे झाल्यामुळे तसेच, नवीन वातावरण असल्याने भांबावून गेले होते. पण मायेने जवळ केल्यावर ते थोड्याच वेळात छान रुळले. खाऊ-पिऊ झाल्यानंतर मात्र त्याला आई आणि भावंडाची आठवण येऊ लागली… ते जे रडायला लागले ते निस्तरताना आमच्या नाकीनऊ आले. कशीबशी एक रात्र काढली आणि…
मनोज गाण्यांचा विषय हा न संपणारा आहे. हे वाक्य मी रीपिट करतोय. आधीच्या लेखात जुन्या गाण्यांबद्दल लिहिले; मग नवीन गाणी इतकी टाकाऊ आहेत का?… असे वाटायला नको. मुळात जुनी गाणी आणि नवी गाणी याच्या दरम्यानची सीमारेषाच पुसट आहे. ‘कयामत से कयामत तक’, ‘डर’, ‘रोजा’, ‘रंगीला’, ‘बाजीगर’, ‘साजन’, ‘कुछ कुछ होता है’, ‘मैंने प्यार किया’, ‘जो जीता वही सिकंदर’, ‘दामिनी’ हे सर्व माझ्या पिढीतील सिनेमे. यातील गाणी हीट झाली, आजही ऐकली जातात. मग ही गाणी नवी समजायची की जुनी?… नाही ठरवता येत! या बहुतांश सिनेमांतील गाणी श्रवणीयच होती. त्यात दुमत असण्याचे कारणच नाही. जर 2000 साल ही सीमारेषा ठरवली तरी, 2001-02…
मानसी देशपांडे ख्यातनाम लेखक व.पु. काळे यांनी म्हटलंच आहे, “ज्याला लेखणीतून संवाद साधता येतो त्याला मी लेखक समजतो…” लेखकांना वाचकांची नस बरोबर माहीत असते. जे आपल्या व.पुं.ना देखील माहीत होती. हे झालं लेखांचं. पण कवितेचं विश्व हे खूप वेगळे आणि अजब असते. कारण, काव्य हे पद्यात्मक पद्धतीने सादर करून तिथे तुम्हाला श्रोतावर्ग मिळतो. नुसती यमक जुळवून कविता होत नाही तर, त्या कवितेत इतकी ताकद असावी लागते की, त्यातील मर्म प्रेक्षकांना म्हणा किंवा श्रोत्यांना समजले पाहिजे. अशीच एक कविता कवी ग्रेस यांची आहे. अतिशय प्रसिद्ध आणि आयुष्याचं सार समजावणारी आहे. ती म्हणजे “भय इथले संपत नाही…” खूप अर्थपूर्ण कविता आणि त्याला…
मोहिनी घारपुरे देशमुख स्वतःच्या अंतरंगात जे उमलून येतं ते चांदणं स्वतःवर सुखाची आल्हाददायक पखरण सदैव करतं. माणसाला सुखाची आस असते म्हणून तो जगभर धावतो. पण त्याला हे कळत नाही की, ज्या सुखाची तो आस धरून जगभर धावतोय, ते सुख खरंतर त्याला त्याच्या अंतर्मनात गवसतं. भौतिक सुखांची आस धरणं आणि त्यांच्या पूर्ततेसाठी आपण नानाविध मार्गाने पैसा कमावणं ही तर जीवन जगण्याची ‘गरज’ आहे, पण या सगळ्या भौतिक सुखाच्या पलीकडे जाऊन पहाल तरीसुद्धा माणूस सुखी होऊच शकतो; कारण सुख हे मनातून उमलून येतं. चार भौतिक सुखाच्या गोष्टी जवळ नाहीत म्हणून रडत बसणारी माणसं मी पाहिली आहेत, पण याउलट भौतिक सुखाच्या गोष्टी नसूनही…
आराधना जोशी डिसेंबर आणि जानेवारी हे महिने शाळांमधील ॲडमिशनचे. आपल्याला हव्या त्या शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा, यासाठी आईवडिलांची सुरू असलेली धावपळ… एका विशिष्ट शाळेतच प्रवेश मिळावा, यासाठी आग्रही आणि त्यामागे कदाचित असणारी प्रतिष्ठा… आदल्या दिवशी दुपारपासूनच त्या-त्या शाळेच्या ऑफिसबाहेर फॉर्म घेण्यासाठी लागलेल्या लांबच लांब रांगा… त्यानंतर तो फॉर्म भरण्यासाठी परत लावलेल्या रांगा… मुलाखतीची पाल्याकडून करून घेतली जाणारी तयारी… प्रत्यक्ष मुलाखतीच्यावेळी पाल्याने गप्प बसणं किंवा मनाला वाटेल ती उत्तरं देणं आणि यामुळे बाबांपेक्षाही आईचं वाढलेलं बीपी…. या गोष्टी आतापर्यंत माहीत होत्या. नशिबाने माझ्या मुलीच्या शाळाप्रवेशाच्या वेळी यातील अनेक गोष्टी कराव्या न लागल्याने शाळाप्रवेश ही माझ्या दृष्टीने सहजसोपी गोष्ट होती. त्यातही…
दिप्ती चौधरी गच्चीवरील पाण्याच्या टाकी खाली रोडरोलरने चार पिल्ले दिली. गच्चीवर आई फिरायला आली होती. तिच्या मागे लगबगीने रोडरोलर धावत वर आली. ओरडून ओरडून टाकीजवळ चल असा आग्रह करत होती. ही काय सांगते बघायला आई तिच्यामागे आली. तिने साद घालून आम्हाला बाहेर बोलावलं. खास आईला दाखवायला! आम्ही सर्व धावतच बाहेर आलो. आम्हाला अनिमिष नेत्रांनी आई बघतच राहिली. थोडे मोठे झाल्यावर आमची जबाबदारी दनू म्हणजे तेव्हाचा डंपर यानेच पूर्ण पणे उचलली. त्याने आम्हाला गच्चीवरून खाली आणले. मोठ्या कौतुकाने आईला हाक मारून आम्हाला दाखवले. झाडावर चढायला, नखाला धार काढायला, उंदीर पकडायला त्यानेच शिकवले. आम्ही खेळत असताना आमच्यावर लक्ष ठेऊन तो बाजूला बसून…
सचिन देसाई आपल्याकडे सगळं काही असतं… पण सगळ्यात मौल्यवान गोष्ट नसेल तर जीवन व्यर्थ असतं. खरंतर, ती मौल्यवान गोष्ट असेपर्यंत आपल्याला त्याची जास्त किंमत नसते आणि जेव्हा दुरावते तेव्हा वेळ निघून गेलेली असते… आई जाऊन आता इतकी वर्षं झाली आहेत, पण असा एकही दिवस गेला नाही की, तिची आठवण झाली नाही. तिला स्मरून या काही ओळी… इतकं लिहूनही वहीचं पान कोरं ग… तुझ्या विना माझं आयुष्य अधुरं ग… गेलीस तू अनंतात न मला भेटता पडलो मी दूर इथे आज असा एकटा नाही कोणी पुसण्यास अश्रुंचा पूर ग… तुझ्याविना माझं आयुष्य अधुरं ग… रोज तुझी आठवण रोज तुला साद रोज तुझ्या…
मंदार अनंत पाटील एकेदिवशी सोसायटीमध्ये खेळत असताना अचानक एक पोपट खाली बसलेला दिसला. पहिल्यांदा वाटले की, दाणे टिपायला खाली आला असावा; पण हळूच जवळ जाऊन बघितले तर तो जखमी असल्याचे लक्षात आले. त्याला अलगद उचलून घरी आणले. काही दिवस काळजी घेऊन तसेच ओषध-पाणी करून खडखडीत बरा केला. पहाडी जातीचा हिरवागार आणि लाल चोचीचा असा राजबिंडा नर पोपट होता. यथावकाश त्याचे नामकरण विठू असे झाले. एक दिवस आम्ही सर्व कामानिमित बाहेर गेलेलो असताना विठूने कधी उड्डाण केले ते कळलेच नाही… पाठी राहिला तो विठूचा रिकामा पिंजरा अन् अनेक आठवणी. असेच काही महिने लोटले आणि हळूहळू मी विठूच्या जाण्याचे दुःख विसरलो. एकदा…
जी. भालचंद्र ज्ञान आणि माहिती यांचा एकमेकांशी संबंध आहे. ज्ञान हे सर्वांसाठी खुले असते. ज्ञान आणि माहिती यातील संदर्भ वैशिष्ट्यपूर्ण आहेत आणि म्हणूनच काही पैलूंमध्ये त्यात समानता आहे. माहिती हा ज्ञानाचा एक प्रकार आहे. ज्ञान ही जरी माहिती नसली तरी, उपलब्ध माहितीच्या प्रमाणावर आधारित आहे. उपलब्ध माहितीमधून जे काही मिळवता येते, ते ज्ञान. तथ्ये, सिद्धांत आणि तत्वे ही शिक्षणाचा आधार असतात आणि त्यांची माहिती गोळा करण्याचे तसेच ती क्रमबद्ध करण्याचे कौशल्य आपल्याकडे आहे. माहिती ही अधिक तथ्यात्मक असली तरी ज्ञान हे विश्वास आणि बांधिलकी याच्याशी जास्त निगडीत आहे. ज्ञान हे कृतीबद्दल असते. ज्ञानाचा उपयोग शेवटपर्यंत होतो. माहिती, ज्ञान आणि डेटा…
मनोज गाण्यांचा विषय हा न संपणारा आहे. त्यातही हिंदी चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ अन् त्यावेळचे रथीमहारथी गायक-गायिका… शब्दांची अतिशय उत्तम जाण असलेले गीतकार आणि प्रत्येक वाद्याचा यथायोग्य वापर करणारे संगीतकार यांची तर साथ होतीच. त्यामुळे ती गाणी श्रवणीय ठरली. भले व्हॉट्सअॅपवर त्यावेळचं अमुक गाणं, अमुक एका पाश्चात्य गाण्याची कॉपी आहे, असं जरी व्हायरल होत असलं, तरी ‘आवाज’ ही बाजू भक्कम आहे ना! लता मंगेशकर, आशा भोसले, किशोर कुमार, मोहम्मद रफी, हेमंत कुमार, मन्ना डे, गीता दत्त, सुरैया, तलत मेहमूद, शमशाद बेगम… शंकर जयकिशन, एस. डी. बर्मन, ओ. पी. नय्यर, नौशाद, सलील चौधरी, वसंत देसाई, सी. रामचंद्र, रोशन, आर. डी. बर्मन, कल्याणजी…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 240
- अवांतर 171
- आरोग्य 88
- फिल्मी 43
- फूड काॅर्नर 181
- मैत्रीण 16
- ललित 499
- वास्तू आणि वेध 353
- शैक्षणिक 72
© 2026 peachpuff-worm-240823.hostingersite.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix
