Author: Team Avaantar

यश:श्री प्राचीन काळापासून कलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यातही भारताच्या प्राचीन संस्कृतीचे ते अभिन्न अंग आहे. त्याचा विशेष हा आहे की, दगड, कास्य आणि मातीच्या मूर्तीमध्ये मोर तयार करणे हा कलाकरांचा आवडता विषय असल्याचे पाहायला मिळते. मनुष्याच्या जीवन आणि कलेमध्ये मोर हे अभिन्न अंग आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. हस्तीदंत, लाकूड, काच आणि विविध धातूंमध्ये केलेल्या कलाकुसरीत बहुतांशी मोराची प्रतिमा बनविली जाते. बंगालमध्ये मयुरपंखी नौकांच्या अनेक कहाण्या आहे. तेजावूर तसेच दक्षिणमधील धातूच्या वस्तू बनविणाऱ्या केंद्रांमध्येही मोराचा वापर केला जातो. तेथे दिव्यामध्ये मोर बसविण्यात येतो. हा पवित्र पक्षी असल्याने मंदिरातील या दिव्यांमध्ये त्याला स्थान देण्यात आले आहे, असे सांगितले जाते. त्याचप्रमाणे…

Read More

चंद्रशेखर माधव साधारण 1985-86 सालातली गोष्ट असावी. मी पाचवी किंवा सहावीत होतो. आम्ही, (आम्ही म्हणजे मी, आई-वडील आणि भाऊ) आसामच्या सहलीला गेलो होतो. आमचे काका सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर गुवाहाटीमध्येच स्थायिक झाले होते. आसाममध्ये तसेच आजूबाजूच्या राज्यांमध्ये पाहण्यासारखी प्रेक्षणीय स्थळे बरीचशी आहेत. एकूणच उत्तर-पूर्व (ईशान्य) भारताला निसर्गाची मोठी देणगी लाभलेली आहे. पहिल्यांदाच एवढा लांबचा प्रवास करणार असल्यामुळे आम्ही दोघेही भाऊ खूप उत्साहात होतो. त्याकाळी पुण्याहून गुवाहाटीला थेट रेल्वे नव्हती. त्यामुळे इथून मुंबई, मुंबईहून गुवाहाटी आणि त्याच मार्गे परत असा एकूण प्रवास ठरला होता. आसाममध्ये गेल्यानंतर काझीरंगा नॅशनल पार्क, कामाख्या मंदिर, शिलाँग अशी ठिकाणे बघायचा प्लॅन आधीच ठरला होता. एकूण मिळून आमची…

Read More

सुहास गोखले (निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमलीपदार्थ विरोधी कक्ष) माणसाचे आयुष्य एका खळखळत्या झऱ्यासारखे प्रवाह कसे बदलेल ते सांगताच येत नाही. 1960च्या दशकात नासिकसारख्या छोट्या शहरात लहानपण घालवताना अगदी सर्वसामान्य perception नुसार, पोलीसांपासून चार हात दूर रहावे, त्यांची दोस्तीही वाईट तर दुश्मनीचा प्रश्नच उद्भवत नाही, असे विचार. अभ्यासात बरा असल्याने मुंबईत जाऊन Microbiologyमध्ये पदवी घेताना कॉलेजमध्ये पहिला आलो. ट्रेकिंगची प्रचंड आवड असल्याने महाराष्ट्रातले 200हून अधिक किल्ले फिरलो, हिमालयात 10 वर्षं ट्रेक्स, स्नो स्किईंगचे दोन कोर्स केले. मुंबई, पुणे, नासिक या त्रिकोणातच खासगी नोकरी तसेच छंद यात मश्गुल असतानाच मुंबईत आक्रित घडले आणि नागपाड्यात पोलीस ऑफिसर असलेला मोठा भाऊ वयाच्या अवघ्या…

Read More

आराधना जोशी 1999 सालचा एक रविवार… रविवार असूनही त्या दिवशी मुंबईत बऱ्याच घडामोडी घडल्या होत्या. अल्फा मराठीसाठी (आताचे झी मराठी) काम करणारे सगळेच रिपोर्टर त्यावेळी फिल्डवर काम करत होते. खरंतर, रविवारच्या दिवशी एवढं काम आणि त्याचं वार्तांकन, तोपर्यंतच्या माझ्या नोकरीत कधीच बघितलं नव्हतं. मी स्वतः त्या दिवशी जवळपास पाच घडामोडींचे रिपोर्टिंग करून साधारणपणे संध्याकाळी 5 वाजता ऑफिसला पोहोचले. संध्याकाळच्या सातच्या बातमीपत्रासाठी कोणत्या बातम्या लगेच पाठवायच्या आणि कोणत्या बातम्या रात्री 9 वाजताच्या बातमीपत्रात घ्यायच्या, याबद्दल बुलेटिन प्रोड्युसरशी बोलणं सुरूच होतं; आणि आमच्या पॉलिटिकल बीट कव्हर करणाऱ्या मंदार परबने अचानक मला बोलावून घेतलं. हातात एक निमंत्रणपत्रिका देत “हा एक कार्यक्रम आहे, आता…

Read More

दिप्ती चौधरी सुरवातीस दोन दिवस आम्ही कॅटरीमध्ये घाबरून होतो, पण नंतर सरावलो. डॉ. इरफान सतत आई आणि बाबांच्या संपर्कात होतेच. त्यांनी प्रयत्नपूर्वक आम्हाला त्या वातावरणाची सवय करून दिली. नंतर आम्ही त्यांना लाड पण करू द्यायला लागलो. आमच्या चाटायच्या पाण्याच्या बाटल्यामधून आम्हांला पाणी प्यायला शिकवा, अशी विनंती आईने केली होती. तर, त्यांनी आम्हाला नळावर पाणी प्यायला शिकवले. मला काही ते आवडत नाही, पण दानूला मात्र ते भारी आवडलं! बाटल्या राहिल्या बाजूला आणि हे महाशय हेच शिकून गेले. पुढे अमेरिकेला गेल्यावर त्याने आईला सरळ स्पष्ट केले की, मी आता वाटीतून पाणी पिणार नाही… स्वयंपाघरातील नळावर महाशय रोज सत्याग्रहला बसायचे आणि आईच्या कामाचा…

Read More

मनोज जोशी दोन दिवसांपूर्वी युट्यूबवर शॉर्ट्स बघत असताना ‘कपिल शर्मा शो’मधील एक सीन दिसला. कपिल शर्माच्या समोर मौसमी चॅटर्जी आणि रीना रॉय बसल्या होत्या. एका पाठोपाठ एक असे प्रश्न कपिल विचारत होता आणि रीनाच्या आधी मौसमीच ते प्रश्न पटापट टोलावत होती. त्यात त्याने एक प्रश्न केला, असा कोणता हीरो होता की त्याला बघायला सर्वात जास्त गर्दी व्हायची. मौसमीने काका अर्थात राजेश खन्नाचं नाव घेतलं. तर, रीना लगेचच विनोद खन्ना म्हणाली… त्यावरून मला विनोद खन्ना गेला तो दिवस आठवला. 27 एप्रिल 2017… त्या दिवशी, ‘ती’बातमी अखेर खरी ठरली! महिन्याभरापूर्वी म्हणजेच मार्च 2017मध्ये विनोद खन्ना याच्या चेहऱ्याशी साधर्म्य असलेल्या, पण अतिशय किरकोळ…

Read More

प्रमोद मनोहर जोशी आपल्या मनात आपल्या आजीचं एक कल्पनेतलं आदर्श असं चित्र नक्की कसं असू शकेल ते आज फेसबुकवर पाहिलेल्या या छायाचित्रात बघून वाटलं. या आजी नेमक्या कोण? यांना मी ओळखत नाही, पण त्यांचं ते सात्विक सोज्वळ निरागस आणि सुमधुर हसू असणारं रूप बघून मला ही कविता सुचली. आपलं वार्धक्यातील रूप देखील अतिशय दिमाखात मिरवणारी एक वृद्ध स्त्री म्हणून या आजी मला जास्त भावल्या आणि अगदी आपसूकच ओळी कागदावर उतरल्या… सीमेपल्याडही वार्धक्याच्या अजून भासशी चिरतरुणी तू वदनावरती प्रसन्नता अन् ओठांवरती मधाळ हासू !! सोसलेच असशील तूही ग अडीअडचणी ऊन उन्हाळे कधी काळोख्या रातीमधली कडाडणारी खिन्न वादळे उभी राहुनी तशीच कणखर…

Read More

मनोज जोशी कोर्टाची पायरी शहाण्याने चढू नये, असे म्हटले जाते. पण मला गेल्या 30 वर्षांत एकदा नव्हे तर, दोनदा पायरी चढावी लागली. कारण किरकोळ होते; पण हे दोन्ही अनुभव भन्नाट होते. एकदा वांद्रे कोर्ट तर, दुसऱ्यांदा वसई कोर्ट. त्यातही आपले पोलीस काय करू शकतात! तसेच, न्याययंत्रणा प्रत्यक्षात कशी चालते, याचा ‘याचि देही याची डोळा’ अनुभव घेतला. भाग -1 लोकमतमध्ये काम करीत असताना माझे ऑफिस चिंचपोकळीवरून नवी मुंबईच्या सानपाड्याला शिफ्ट झाले. त्यामुळे 2006 ते 2009 अशी चार वर्षे मी विरार ते सानपाडा आणि परत असा प्रवास करीत होतो. तीन गाड्या बदलून ऑफिसला जात होतो आणि तीन गाड्या बदलून घरी येत होतो.…

Read More

यश:श्री आग्रा येथील ताजमहालचे देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षण आहे. स्थापत्यशास्त्राचा हा उत्तम नमुना म्हणून ओळखला जातो. मुगल बादशाह शहाजहाँ याने जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेला ताजमहाल बांधून घेतला. कलारसिक असलेल्या शहाजहाँने कलाकार आणि कलेला राजश्रय दिला. या ताजमहालप्रमाणेच त्याचे सिंहासन देखील त्यावेळी चर्चेचा विषय ठरले होते. भारतीय परंपरेनुसार भारतातील राजेमहाराजे सिंहासनावर बसून राज्यकारभार चालवित होते. परंतु शहाजहाँ मोराच्या सौंदर्याने प्रभावित झाला होता. म्हणून परांपरागत सिंहासनाला दूर करत त्याने मयुरासन बनवून घेतले. हेच ते तख्त-ए-ताऊस! थोर विदुषी दुर्गा भागवत यांचा याविषयीचा एक लेख वाचनात आला होता. मोराला फारशी भाषेत ‘ताऊस’ म्हणतात. म्हणून त्या आसनाला ‘तख्त- ए- ताऊस’ म्हटले जात होते. या आसनावरील…

Read More

चंद्रशेखर माधव मी पुण्यात पर्वती परिसरात रहातो. आमच्या इमारतीच्या मागेच पर्वती टेकडी आहे. एकूण परिसर हवेशीर आणि निसर्गरम्य आहे. पण परिसर तसा मोकळा असल्याने पहिल्यापासूनच भुरटे चोर वगैरे येण्याचे प्रमाण जरा जास्त आहे. साधारणपणे 15-16 वर्षांपूर्वीची, म्हणजे 2007-2008मधील घटना असेल. मध्यरात्री पावणेबाराचा सुमार होता. माझ्या घराच्या मागच्या खोलीमध्ये बाहेर जाण्याचा अजून एक दरवाजा आहे. त्या दरवाजाला कडी लावली आहे की नाही, हे पहात असताना माझ्या असं लक्षात आलं की, बाहेरील लोखंडी दरवाज्याला एक माणूस कडी लावत आहे. लक्षात आल्यानंतर मी हळूच पत्नीला खूण करून शांत राहण्याला सांगितलं आणि तिला खुणेनेच सांगितलं की, बाहेर कुणीतरी आहे आणि मी मुख्य दरवाजाने बाहेर…

Read More