Author: Team Avaantar

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – व्यवसाय चांगला चालेल आणि तुम्हाला चांगला नफा मिळेल. तुमच्या कठोर परिश्रमामुळे नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला पदोन्नती मिळू शकते. नवीन काम मिळण्याचीही दाट शक्यता आहे. परदेशी दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे, जो फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तम यश मिळेल. तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. स्वतःला हायड्रेट ठेवा. वृषभ – नवीन करिअरच्या संधी उपलब्ध होतील. एखाद्या कामामुळे तुमची प्रशंसा होऊ शकते. व्यवसायात उत्पन्न वाढवण्यासाठी आणि नोकरीत आपले काम समर्पणाने पूर्ण केले पाहिजे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आजचा दिवस चांगला असेल. उन्हात फिरल्याने डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे योग्य ती काळजी घ्या. मिथुन -…

Read More

दीपक तांबोळी भाग – 2 रात्री संगीताने अनेक वेळा विनवणी करूनही शुभा न जेवताच झोपून गेली. रवी घरी परतल्यावर संगीताने त्याला सर्व हकीकत सांगितली. शुभाच्या वागण्याने तोही चिंतेत पडला. शुभा जिवाचं काही बरंवाईट करून घेईल, या विचाराने रात्रभर दोघांना झोप आली नाही. बरं तरी, शुभाच्या रूमच्या दरवाजाची कडी तुटली असल्यामुळे तिला दरवाजा आतून लावता आला नाही. नाहीतर, रात्रभर दोघांच्या जीवाला घोर लागून राहिला असता. तरीसुद्धा दोघंही आलटून पालटून शुभाच्या खोलीत जाऊन तिला पाहून येत होते. रात्री लवकर झोपल्यामुळे शुभाला सकाळी सहा वाजताच जाग आली. अख्खा दिवस तिच्या समोर होता. टाइमपाससाठी आता मोबाइलही नव्हता, तो तर आईने तोडून टाकला होता आणि…

Read More

राजीव जोशी 27 सप्टेंबर 1990… त्या दिवशी मी त्याला पहिल्यांदा पाहिलं आणि त्याच्या प्रेमात पडलो! तो म्हणजे मुरबाडजवळ देहेरी गावात असलेला ‘गोरख गड’. हा गड चढायला थोडासा अवघड. सुरुवातीला थोडीशी चढण आहे, त्या नंतर सरळ पायवाट, नंतर परत एकदा मातीची चढण आहे… त्यावरून घसरायला होतं आणि नंतर असलेला अतिशय अवघड रॉक पॅच. आजूबाजूला असलेला अतिसुंदर निसर्ग. खूप आवडला हा गड प्रेमात पडलो मी त्याच्या आणि ठरवलं की 100 वेळा तरी या गडावर यायचं! 1990 ते 2009 या कालावधीत मी 65 वेळा गोरख गडावर आलो. या 19 वर्षांत खूप मित्र ओळखीचे माझ्याबरोबर आले. काहींना हा गड आवडला तर, काही घाबरले, काही…

Read More

रेवती निलेश पांडे काल बाजारात अचानक सुधा काकू भेटल्या. गजबजलेला रस्ता, तुफान गर्दी, पण काकूंच्या गप्पांचा ओघ मात्र नेहमीप्रमाणेच अव्याहत सुरू होता. आजूबाजूच्या गोंगाटाचा त्यांना कधीच फरक पडत नाही आणि कालही पडला नाही. पंधरा मिनिटं इकडल्या-तिकडल्या गप्पा झाल्यावर विषयाची सुई मूळ मुद्द्यावर आली. काकू सांगू लागल्या की, त्यांच्या भावाला चक्क स्वतःचा हक्काचा फ्लॅट सोडून भाड्याच्या घरात शिफ्ट व्हावं लागलं. पुण्यासारख्या ठिकाणी किती कठीण जातंय त्याला! आणि या सगळ्याला त्यांचा भाचा सारंग कसा कारणीभूत आहे वगैरे वगैरे… काकू वैतागून म्हणाल्या, “काय म्हणावं बाई या Gen-Z पोरांना? काय विचार करतात अन् काय वागतात, त्यांचं त्यांनाच ठाऊक! आमच्या काळी कसं होतं, वडिलांनी म्हटलं…

Read More

डॉ. प्रज्ञावंत देवळेकर आपल्या देशात पालकांकडून पाल्यास धाक दाखवण्यासाठी जसा डॅाक्टरांचा वापर केला जातो तद्वतच आपल्या पार्टनरला एखादा मेसेज कन्वे करण्यासाठीही डॅाक्टरांचा वापर केला जातो… “यांना सांगा सिगारेट सोडा…” किंवा “तिला पालेभाज्यांव्यतिरिक्तही जीवनसत्वयुक्त पदार्थ असतात ते बनवा, असं सांगा…” अशी विनंती लोक अधूनमधून करत असतात. असाच एक दिवस ओपीडीत याच श्रेणीतलं एक जोडपं आलं होतं; आजार कमी आणि एकमेकांबद्दल आक्षेपच अधिक! बरं यातल्या बऱ्याच गोष्टी तर अवैद्यकीय होत्या… पण चालतंय, भारतीय माणूस बहुदा अघळपघळच असतो… तिला त्यानं वाढवलेली ‘मटनचॅाप्स बियर्ड’ अर्थात ‘दाढी’ आवडत नव्हती तर, तो ‘फॅशनंय’ म्हणून अडून बसला होता… आता मी त्याला दाढी काढायला सांगावं, असं तिचं म्हणणं…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा आतां बहु बोलोनी सांगावें । तें एकिहेळा घे पां आघवें । सतासतही जाणावें । मीचि पैं गा ॥299॥ म्हणोनि अर्जुना मी नसें । ऐसा कवणु ठाव असे । परि प्राणियांचें दैव कैसें । जे न देखती मातें ॥300॥ तरंग पाणियेंवीण सुकती । रश्मि वातीविण न देखती । तैसे मीचि ते मी नव्हती । विस्मो देखे ॥301॥ हें आंतबाहेर मियां कोंदलें । जग निखिल माझेंचि वोतिलें । कीं कैसें कर्म तयां आलें । जे मीचि नाहीं म्हणती ॥302॥ परि अमृतकुहां पडिजे । कां आपणयातें कडिये काढिजे । ऐसें आथी काय कीजे । अप्राप्तासि ॥303॥ ग्रासा एका अन्नासाठीं…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – अधिक मेहनत करावी लागेल आणि तुमची दैनंदिन दिनचर्या थोडी गोंधळाची असू शकते. अनावश्यक रागामुळे नुकसान होऊ शकते, म्हणून शांत राहा. उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधण्यास एखाद्या मित्राची मदत मिळू शकते, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. कोणत्याही मुद्द्यावर घाईघाईने कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे विशेष लक्ष द्यावे. वृषभ – आत्मविश्वास आणि चिंता आज हातात हात घालून  एकत्र राहतील. कौटुंबिक समस्यांमुळे मानसिक ताण वाढू शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नकारात्मक विचार टाळा. जुन्या मित्रांच्या भेटी होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या मुलाखतीत यश मिळेल. आरोग्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका. मिथुन – रागावर…

Read More

डॉ. अस्मिता हवालदार ‘आहे मनोहर तरी’ हे सुनीताबाई देशपांडे यांचे आत्मचरित्र आले आहे, अशी चर्चा मी घरात ऐकली होती. त्यावरून एवढंच समजलं की, याबद्दल बरीच उत्सुकता सर्वांना आहे. याचे कारण त्या महाराष्ट्राचं लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडेंच्या पत्नी आहेत… असेच असावे, असं मला वाटलं होतं. पण सुनीताबाई स्वत: एक विलक्षण व्यक्तिमत्व आहेत, हे इतरांच्या बोलण्यातून समजलं. त्यावेळी मी पुस्तक वाचलं होतं, पण एक-दोन प्रसंग वगळता फारसं काही लक्षात राहिलं नाही. पुस्तकाच्या नावापासूनच उत्सुकता निर्माण होते, कारण पुढची ओळ ‘गमते उदास’ अशी विरोधाभासी आहे… अर्धवट उघडलेल्या दाराबद्दल वाटावी तशी! प्रस्तावनेत त्या ‘गमते उदास‘बद्दल सुतोवाच करायला सुरुवात करतात. एक होता राजा आणि…

Read More

दिलीप कजगांवकर रविवारची सकाळ… आठ वाजले होते. सुटीचा दिवस असल्याने पुणेकर आरामात उठतात आणि नाश्ता बाहेरच करतात… त्यामुळे एफ.सी. रोड तसा मोकळाच होता. नेहमी आत शिरायला जागा नसलेले खवय्यांचे आवडते रेस्टॉरंट खवय्यांच्या प्रतीक्षेत होते. साधा पायजमा, फाटलेला फुलबाह्यांचा शर्ट, डोक्यावर मळलेली टोपी, पायात अगदी साध्या चपला आणि पाठीवर भलीमोठी सॅक घेतलेल्या एका इसमाने रेस्टॉरंटमध्ये प्रवेश केला. नेहमीच्या आकर्षक, आधुनिक तरुणाईच्या तुलनेत तो फाटका माणूस होता. “काय हवं तुला?” वेटरने विचारले. “माझे काही मित्र येणार आहेत, मग ऑर्डर देतो,” फाटक्या माणसाने सांगितले. पाच मिनिटांनी फाटका बाहेर गेला. “बरं झालं, घाण गेली,” म्हणत वेटरने फाटका बसलेली खुर्ची डेटॉल टाकून स्वच्छ केली. दोन-तीन…

Read More

डॉ. किशोर महाबळ शाळेतील बहुतांश विद्यार्थ्यांना शिकण्यात मुळीच रस नसतो. शक्यतो शिकणे टाळण्याचाच त्यांचा प्रयत्न असतो. अभ्यास न करण्यासाठी आणि होता होईतो वर्गातही न बसण्यासाठी विद्यार्थी काही ना काही कारणे शोधत असतात. तहान लागलेली असो की नसो, त्या निमित्ताने आणि अन्य कोणत्या ना कोणत्या कारणाने वर्गाबाहेर जाण्याचा ते प्रयत्न करतात. वर्गात बसलेच तर, त्यांच्या चेहऱ्यावर भरपूर कंटाळा आणि निरुत्साह दिसतो. अंगाला आळोखेपिळोखे देणे, कारण नसताना इकडे तिकडे बघणे, आपल्या आजूबाजूच्या विद्यार्थ्यांशी बोलणे यासारख्या असंख्य अनावश्यक गोष्टी करण्यात मुले वेळ घालवतात आणि अनेकदा सुट्टीची वाट बघत बसतात, असे शिक्षकांचे म्हणणे असते. विद्यार्थ्यांचे हे वागणे, हा निरुत्साह शिक्षकांना फार त्रासदायक वाटतो. शिकण्याची…

Read More