Author: Team Avaantar

प्रणाली वैद्य भाग – 13 निशा पुन्हा म्हणाली… “कोणी विचारलं की म्हणायचं, माझे क्लास आहेत, प्रोजेक्ट्स आहेत, मी जाऊ शकत नाही. आणि हो… त्या आराध्यासारखा गोंधळ घालायचा नाही. तिनं किती गुण मिळवलेत ते कौतुकाचं नाही…” “तिचं मार्क मिळवणं तेवढंच सगळ्यांना दिसतंय. पण काही दिवस थांब… तू काय आहेस, हे सगळ्यांना दाखवून दे!” अन्वी शांत होती, पण तिच्या डोळ्यांत एक विचित्र चमक होती. तिच्या मनात एक कट तयार होत होता… आराध्या जणू तिच्या आयुष्यावर सावलीसारखी पसरलीय, आणि आता ती सावली पुसून टाकण्याची वेळ आली होती… त्या रात्री, खोलीच्या चार भिंतींमध्ये एक बिघडलेली विचारधारा खोलवर रूजत होती… आणि भविष्यात एक वादळ नक्कीच…

Read More

प्रणाली मंगेश महाशब्दे असे म्हणतात की, तुमचं राहणं तुमची श्रीमंती दाखवते आणि तुमचं वागणं तुमचे संस्कार दाखवते… एका गावात एक छोटे कुटुंब रहात होते. नवरा, बायको आणि त्यांच्या सुमन आणि मीनल या दोन मुली. दोन्ही मुली शाळेत जात होत्या. मुली खूप हुशार असल्यामुळे प्रत्येक परीक्षेत त्यांना यश हमखास मिळत होते. वडिलांना खूप पगार नव्हता, पण आईने कधी त्याबद्दल तक्रार केली नाही. एकेदिवशी शाळा तपासणीसाठी काही अधिकारी शाळेत आले. अधिकारी प्रत्येक वर्गातील प्रत्येक मुलाबरोबर बोलत होते, प्रश्न विचारत होते. गावातील काही बड्या लोकांची मुलं पण या शाळेत शिकत असल्यामुळे अधिकाऱ्यांबरोबर असलेले इतर कर्मचारी त्या मुलांची आवर्जून ओळख करून देत होते. ही…

Read More

माधवी जोशी माहुलकर कोणाच्या रंगरुपावर जाऊ नये, कारण ते काही कोणाच्या हातात नसतं! व्यक्तीमधले गुणविशेष पाहावे, चांगले गुण असतील तर ते निश्चितच दखलपात्र ठरतात. माझ्याकरिता माझ्या घरकाम करणाऱ्या बायका महत्त्वाच्या व्यक्ती आहेत! गेल्या 14 वर्षांपासून माझ्या घरी एक बाई कामाला आहे, त्यामुळे ती आता आमच्या कुटुंबातील सदस्य असल्यासारखी आहे! खरंतर, पहिल्यांदा ती जेव्हा माझ्या घरी कामाला आली, तेव्हा तिला महिन्यावारी घरकामाला बोलावण्याचे माझे काही निश्चित नव्हते. तिला मी केवळ डस्टिंगकरिता बोलावले होते. डस्टिंग करायचे काम म्हणजे काय असतं, हे देखील तिला माहीत नव्हतं! उलट तिला ते काम शिकवताना माझीच अवस्था “आ बैल (नव्हे गाय) मुझे मार…” अशी झाली होती. परंतु…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते । एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुखम् ॥15॥ तरी ज्ञानयज्ञु तो एवंरूपु । तेथ आदिसंकल्पु हा यूपु । महाभूतें मंडपु । भेदु तो पशु ॥239॥ मग पांचांचे जे विशेष गुण । अथवा इंद्रियें आणि प्राण । हेचि यज्ञोपचारभरण । अज्ञान धृत ॥240॥ तेथ मनबुद्धीचिया कुंडा- । आंतु ज्ञानाग्नि धडफुडा । साम्य तेचि सुहाडा । वेदि जाणें ॥241॥ सविवेकमतिपाटव । तेचि मंत्रविद्यागौरव । शांति स्रुकस्रुव । जीव यज्वा ।।242॥ तो प्रतीतीचेनि पात्रें । विवेकमहामंत्रें । ज्ञानाग्निहोत्रें । भेदु नाशी ॥243॥ तेथ अज्ञान सरोनि जाये । आणि यजिता यजन हें ठाये । आत्मसमरसीं न्हाये । अवभृथीं…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – अनावश्यक चिंता तुमच्या मनात नकारात्मक विचार निर्माण करू शकते. मात्र, मनोरंजन आणि प्रवासाचा बेत यामुळे उत्साह निर्माण होईल. भावनिक नात्यांमध्ये विश्वासाची कमतरता जाणवेल. आर्थिक संघर्षांनंतर इच्छित यश दृष्टीपथात येईल. वृषभ – विचारपूर्वक कृती केली तर, लगेच त्याचे सकारात्मक परिणाम मिळू शकतात. इतरांना मदत केल्याने तुमचा सामाजिक दर्जा वाढेल. आर्थिकदृष्ट्या इतरांवर जास्त अवलंबून राहण्याचे टाळा. भावंडांसोबतचे जुने प्रश्न सुटतील. मिथुन – कुठल्याही वादाच्या प्रसंगी संयम बाळगणे आवश्यक आहे. कायदेशीर अडचणी टाळा. बँकिंग आणि गुंतवणूक क्षेत्रात काम करणाऱ्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी. रागावर नियंत्रण ठेवा. तसेच, बाहेरचे खाद्यपदार्थ टाळा, आरोग्याची काळजी घ्या. कर्क…

Read More

दीपक तांबोळी “शुभा, ए शुभा, उठ लवकर… अगं किती वेळ झोपून रहाणार आहेस?” संगीता आपल्या लेकीला ओरडून म्हणाली. “झोपू दे ना आई. रात्री दोनपर्यंत मी झोपले नव्हते!” “माहितेय मला दोनपर्यंत तू काय केलं असशील ते! फेसबुक नाहीतर व्हॉटस्ॲप वर चॅटिंग या व्यतिरिक्त करतेस तरी काय तू? चल उठ लवकर. नऊ वाजलेत…” “तू ना बाई अशीच आहे. माहितेय माझ्या मैत्रिणी दहापर्यंत झोपलेल्या असतात!” “चांगल्या मुलींशी तर तू मैत्रीच नको करू. आपल्या कामवालीची मुलगी बघ. सगळं आवरून सकाळी सात वाजता आपल्याकडे हजर असते.” “ए बाई, नको लेक्चर देऊ सकाळी सकाळी… आणि कुणाचीही उदाहरणं नको देत जाऊस. उठते मी.” शुभा धुसफूस करतच उठली.…

Read More

सतीश बर्वे गेल्या महिन्यातली गोष्ट. मी पुण्याला गेलो होतो, आमच्या कुटुंबातील एका मंगलकार्याला उपस्थित राहण्यासाठी. मुहूर्त उशिराचा होता. लग्न लागून जेवणं आटपून आम्ही नुसत्या गप्पा मारत बसलो असताना डोळ्यांवर पेंग यायला लागली म्हणून मी आणि मामेभाऊ त्याच्या स्कूटरवरून कार्यालयापासून दूर पौड रोडला मोरे विद्यालयाच्या जवळच्या एका चहाच्या टपरीवर गेलो होतो. संध्याकाळी साडेपाच-सहाची वेळ होती. तरुणाईची बऱ्यापैकी गर्दी होती तिथे. महाराष्ट्रातल्या सध्याच्या खमंग राजकारणावर चर्चा सुरू होती. इतक्यात एका मुलाच्या तोंडून अजब शब्द ऐकले… “अरे यार, तुमचा काही का पक्ष असेना आमचा सध्या एकच पक्ष आणि तो म्हणजे पोरींवर लक्ष!” ते ऐकून मी दचकून त्या घोळक्याकडे पाहिले. बहुतेक नोकरी धंद्याला नुकतीच…

Read More

रश्मी ठोसर शेवग्याच्या उत्पादनात भारत प्रथम क्रमांकावर असून आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांत त्याची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. महाराष्ट्रात शेतांमध्ये, बागांमध्ये तसेच शहरांमध्ये लागवडीखाली शेवग्याचे वृक्ष दिसून येतात. आयुर्वेदानुसार शेवग्याचे मूळ, खोड, पाने, फुले, फळे आणि बिया इत्यादी भाग उपयुक्त आहेत. मुळांचा रस दमा, संधिवात, प्लीहा आणि यकृतवृद्धी, मुतखडा यावर उपयोगी असतो. मुळांच्या सालींचा रस कानदुखीवर वापरतात. तर, त्याची साल कोकणात नारूसाठी वापरतात. पाने आणि फुले कृमिनाशक, वायूनाशी मानली जातात. शेंगा आतड्याच्या कृमींवर प्रतिबंधक आहेत. शेवग्याच्या शेंगांचा उपयोग आहारात अनेक प्रकारे करतात. आता आपण त्याची गोडी आमटी कशी करतात ते पाहू. हेही वाचा – Recipe : केळफुलाचे…

Read More

मानसी देशपांडे काही दिवसांपूर्वी व्हेलेंटाईन डेचा माहोल होता. म्हणजेच, नुकतंच प्रेम झालेले प्रियकर – प्रेयसी, तसंच प्रेमाचं रुपांतर लग्नात झालेले नवरा – बायको… सर्वच कमी-जास्त प्रमाणात साजरा करताना दिसतात. खोटं का बोला, मी पण साजरा करते! आपल्या आयुष्यात प्रेमाला खूप जास्त महत्त्व आहे आणि असायलाच हवं. एका ठराविक वयानंतर काही गोष्टी या अशा असतात, ज्या आपण आई-वडिलांशी बोलू शकत नाहीत, मग तिथे लागते आपली हक्काची, प्रेमाची व्यक्ती. हे प्रेम कसं होतं? काहींचं एका नजरेत, तर कोणी डोळ्यांच्या प्रेमात पडतं. हे प्रेमाचं गाव फारच सुंदर असतं… जिथे राग असतो, रुसवा असतो, लाडिकपणा असतो तसंच शपथा पण असतात. एकदा जीव गुंतला की,…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा अर्जुना हे गुरुवी भक्ती । सांगितली तुजप्रती । आतां ज्ञानयज्ञें यजिती । ते भक्त आइकें ॥228॥ परि भजन करिती हातवटी । तूं जाणत आहासि किरीटी । जे मागां इया गोष्टी । केलिया आम्हीं ॥229॥ तंव आथि जी अर्जुन म्हणे । तें दैविकिया प्रसादाचें करणें । तरि काय अमृताचें आरोगणें । पुरे म्हणवे ॥230॥ या बोला अनंतें । लागटा देखिलें तयातें । कीं सुखावलेनि चित्तें । डोलतु असे ॥231॥ म्हणे भलें केलें पार्था । एऱ्हवीं हा अनवसरु सर्वथा । परि बोलवीतसे आस्था । तुझी मातें ॥232॥ तंव अर्जुन म्हणे हें कायी । चकोरेंवीण चांदिणेंचि नाहीं । जग…

Read More