Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
संगीता भिडे (कमल महाबळ) चैतराचा गं वसंत येई हसत नाचत पाना फुलांना बहर, आनंदाला येई पूर॥ मधुप गुंजन, कोकिळ कूजन तनमनात नर्तन, धरती झाली गं संपन्न॥ चैतराचे सुख, दारी आला गं वैशाख उभा पेटला वणवा, त्याचा दाह गं साहिना॥ ज्येष्ठ आषाढाचा ग्रीष्म, भेगाळले अंग अंग दाह साहू मी किती, दुभंगले अंतरंग॥ डोळे लागले आषाढी, झाली मेघांची गं दाटी बरसला गं श्रावण, धरतीला ये नहाण॥ ल्याली वर्षा राणी, हिरवा शालू भरजरी सजली, नटली, जणु नवीन नवरी॥ हातीं पुष्पमाला शरदाला गं वरी पिऊनी चांदणे, रोमांचली रोमरोमी॥ सुगीचे दिस, धान येई शीगोशीग स्वागतास सिद्ध, बाळ आला गं हेमंत॥ पाहताच बाळलीला, हरखली गं धरणी…
आराधना जोशी साल 2007. झी मराठीबरोबर 2003पासून ‘नमस्कार झी मराठी’ या फोन इन कार्यक्रमामुळे जुळलेले ऋणानुबंध कार्यक्रम बंद झाल्यामुळे संपुष्टात आले होते. झी 24 तास या वृत्तवाहिनीत येण्यासाठी संबंधितांनी सुचवले होते. मात्र शिफ्ट ड्यूटी आणि लहान मुलगी यामुळे नकार दिला होता. त्यामुळे फेब्रुवारीपासून नव्या नोकरीच्या शोधात होते. एके दिवशी पत्रकारितेतील माझे गुरु प्रकाश अकोलकर सरांचा फोन आला. “सध्या काय करतेयस? माझ्याकडे तुझ्यासाठी एक प्रपोजल आहे. लेखिका कविता महाजन यांना त्यांच्या प्रोजेक्टसाठी मदतनीस हवी आहे. तुझं नाव मी सुचवलं आहे. तू त्यांना जाऊन भेट. मी नंबर पाठवतो. तू त्यांच्याशी बोलून घे,” असा निरोप सरांनी दिला. लगेच कविता मॅडमचा नंबरही पाठवला. मी…
यश:श्री थोर विदुषी दुर्गा भागवत यांचे वडील, नारायण भागवत तसेच त्यांचे सहकारी कपिलराम वकील यांच्या ‘डालडा’वरील संशोधनाबद्दलची एक कथा अतिशय रोचक आहे. नारायण भागवत 1920च्या सुमारास टाटांच्या ऑइल कंपनीत मॅनेजर होते. तर, कपिलराम वकील हे डायरेक्टर होते. (कपिलराम वकिलांनी पुढे ‘ओखा सॉल्ट वर्क’ सुरू केले आणि नंतर टाटांनी ते विकत घेतले. त्याला आता मिठापूर असे नाव पडले आहे.) या ऑइल कंपनीचे मालक सर दोराबजी टाटा होते. त्यावेळेला या दोघांनी मिळून एक नवा प्रयोग चालविला होता; जगात तोपर्यंत तो सिद्ध झालेला नव्हता. तो प्रयोग म्हणजे म्हणजे ‘डालडा’ तुपाचा. नारायण भागवत आणि कपिलराम शर्मा यांच्या खालोखाल जपानला यात थोडंफार यश मिळालं होतं.…
मनोज जोशी कोंबडी आधी की अंड आधी? या प्रश्नाप्रमाणेच टीव्ही चित्रपट या माध्यमांचा जनमानसावर परिणाम होतो, की समाजात घडणा-या घटना लहान-मोठ्या पडद्यावर दाखविल्या जातात? हा देखील ठोस उत्तर नसलेला प्रश्न आहे. अलीकडे काही गुन्हे टीव्हीवरील गुन्हेगारीवर आधारित मालिका पाहून घडल्याचेही समोर आले आहे. तर दुसरीकडे, प्रेमापोटी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरवर चित्रपट तयार होत आहे. पबजी गेम खेळतान सचिन मीणाशी तिचे सूत जुळले आणि ती आपल्या चार मुलांना घेऊन ती नेपाळमार्गे भारतात आल्याचे सांगण्यात येते. काही वर्षांपूर्वी अभिनेते विजू खोटे यांच्याशी गप्पा मारताना, सहज हा विषय छेडलला होता. पण त्यांनी याबाबत चांगलं मत मांडलं आहे. ते म्हणाले, चित्रपटाचा जनमानसावर निश्चितच…
चंद्रशेखर माधव आमच्या लहानपणी, म्हणजे साधारण 1982-85च्या दरम्यान, दर दिवाळीत आम्ही कापड आणून ते शिवून घेत असू. शर्ट आणि पॅंटचे एकाच प्रकारचे कापड घ्यायचे आणि वडील, मुलांनी त्या कापडाचे कपडे शिवायचे अशी एक फॅशन त्या काळात प्रचलित होती. तयार कपडे घेण्याची फारशी पद्धत नव्हती. सुमारे 1988-90नंतर तयार कपडे घेण्याचे प्रमाण वाढले. माझ्या घरची परिस्थिती अगदी गरिबीची निश्चितच नव्हती, पण खिशात खूप पैसा खेळत होता, असंही नाही. त्यामुळे वडील जे घेऊन देतील ते समाधानाने स्वीकारायचं, असा शिरस्ता अंगवळणी पडला होता. दर दिवाळीला, कापड घेण्याच्या वेळी, आमचे वडील मला आणि माझ्या मोठ्या भावाला बरोबर घेऊन जात. कापड घ्यायचे म्हटले की, आमची नेहमीची…
मंदार अनंत पाटील ब्रुस हा लॅब्रेडॉर जातीचा अतिशय लाघवी, खट्याळ आणि माझ्यावर विलक्षण प्रेम करणारा कुत्रा होता. माझा लहानपणापासूनचा मित्र अमेय महाजनचा तो श्वान. 2017 साली पाच वर्षांनी मी भारतात आलो असताना एके दिवशी सहजच सकाळी सोसायटीबाहेरच पहिली भेट झाली. ब्रुस त्यावेळी जेमतेम चार महिन्यांचा असेल. पण अतिशय मस्तीखोर आणि खट्याळ होता. बघता क्षणीच आम्ही एकमेकांचे घट्ट दोस्त झालो. नंतर नंतर माझे वारंवार भारतात जाणे झाले. भारतातून लंडनला परत आल्यावर आणखी एक दणकट पण तितकाच लाघवी असा टायसन (रोटवीलर जातीचा) श्वान मला भेटला. तो माझ्या लंडनमधील सोसायटीतील टिबोर नावाच्या मुलाने दत्तक घेतलेला साडेतीन वर्षांचा पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेला श्वान. पहिल्या…
जी. भालचंद्र जवळपास सर्वांचाच बँकेशी संबंध येतो. कितीही ऑनलाइन व्यवहार झाले तरी, कुठे ना कुठे तरी बँक कर्मचाऱ्यांशी डोकं लावावंच लागतो. बँकांधील काही अनागोंदी कारभाराशी संबंधित ‘बँक व्यवहार आणि अधिकाऱ्यांच्या करामती’ या सदरातील माझा दुसरा अनुभव आता कथन करीत आहे. हा अनुभव महाराष्ट्रीयन कुटुंबांना एकेकाळी जवळची वाटणाऱ्या एका राष्ट्रीयीकृत बँकेबाबतचा आहे. काही वर्षांपूर्वी माझी पत्नी आणि मी, आम्ही दोघांनी या बँकेच्या आमच्या घराजवळील शाखेत लॉकर उघडण्याचा निर्णय घेतला. लॉकर उघडण्यासाठी करावयाचे सर्व सोपास्कार आम्ही बँकेत पूर्ण केले. त्याचवेळी आम्ही बँकेला असे निर्देश दिले होते की, आमच्या लॉकरचे वर्षाचे भाडे आमच्या जॉइंट अकाऊंटमधून वळते करण्यात यावे. पहिली चार-पाच वर्षं लॉकर भाडे…
दिप्ती चौधरी दनूला बाहेर जाण्यात अजिबात रस नव्हता म्हणून दिदीने मला पट्टा घालून घरात फिरवायचा सराव सुरू केला. थोडे दिवस मी शिस्तीत फिरतो, हे बघून एका संध्याकाळी खालची गडबड कमी झाल्यावर थोडे उशिरा मला पट्टा घालून लिफ्ट समोर उभे केले. लिफ्ट आल्यावर मी दबकत आत शिरलो. काय होते काही कळेना, धक्का बसला आणि ती छोटीशी खोली अचानक खाली जायला लागली. चारी बाजूने बंद त्यामुळे मी खूप घाबरलो. इतक्यात पुन्हा धक्का बसून ते प्रकरण एकदाचे थांबले आणि समोर दरवाजा उघडून बघतो तो काय… जमीन! दरवाजासमोरील पायऱ्यांच्या बाजूला सुशोभित बाग होती. त्यात उंच झुडपांचे दाट जंगल होते… लपायला एकदम भारी जागा! मी…
स्नेहल अ. गोखले मी आणि सुमती फोनवर बोलताना नेहमीप्रमाणे लहानपणीच्या आठवणी निघाल्या. तेव्हा उल्काही डोळ्यासमोर आली. आम्ही नेमके केव्हा भेटलो, हे आठवत नाहीये. विजू माझ्या वर्गातच होती. साधारण तिसरी, चौथीत असू आम्ही. मी, उल्का, विजू, शकू केव्हा मैत्रिणी झालो, हे कळलेच नाही. मग काय ते खेळ… डब्बा ऐसपैस, लगोरी, लंगडी, ठिकरी, सुरपारंब्या असे सर्व तऱ्हेचे खेळ आम्ही खेळलो, ते आठवते. दोरीवरच्या उड्या किती मारल्या त्याला गिनतीच नाही. मे महिन्याच्या सुट्टीत पत्ते, सागरगोटे असे बैठे खेळ… शिवाय सायकलवर भटकंती, गोखले हॉलमध्ये लायब्ररीत जाऊन पुस्तके वाचणे, सकाळी टिळक टँकवर पोहणे… सर्व काही आठवतंय. आमच्या शाळेतून चिपळूणकर सर पोहायला शिकवण्यासाठी यायचे? मी त्यांना…
आराधना जोशी अशीच एकदा फेसबुकवरील पोस्ट वाचनात आली. मानसिक आरोग्याशी संबंधित आणि मुख्य म्हणजे borderline personality संदर्भात असणारी ती पोस्ट वाचून पायाखालची जमीन सरकली. किती प्रकारच्या छुप्या मानसिक तणावांशी आणि आजारांशी आपण नकळतपणे झुंजत असतो, ते लक्षात आलं. मुख्य म्हणजे असे ताण घेऊन एखादी व्यक्ती समाजात वावरत असताना तिच्या पालकांना किंवा जवळच्या व्यक्तींना याची साधी माहिती होऊ नये, यासारखे दुर्दैव नाही. अर्थात, याला जबाबदार नेमकं कोण? याचं उत्तर मिळालं तरी, जाणाऱ्या व्यक्ती परत येणार नसतात. तणावात असताना अनेकदा पालकांकडून दुर्लक्ष केलं जातं. शारीरिक दुखण्यातून आराम मिळावा यासाठी आकाशपाताळ एक करणारे पालक मानसिक आजाराबाबत संवेदनशील का नसतात? मानसिक आजाराचा संबंध कायम…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 241
- अवांतर 171
- आरोग्य 88
- फिल्मी 43
- फूड काॅर्नर 182
- मैत्रीण 16
- ललित 501
- वास्तू आणि वेध 354
- शैक्षणिक 72
© 2026 peachpuff-worm-240823.hostingersite.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix
